सत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण शनिवारी दुपारी चार वाजता चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार पडले. लाखो भाविकांनी या रिंगणाचा आंनद अनुभवला. तत्पुर्वी दुपारी एक वाजता वारकऱ्यांनी लोणंदकरांचा निरोप घेतला. ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचे लिंब येथे असल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसत होता.

ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

वाहतुकीत अडथळा येऊ नये, म्हणून पोलिसांनी सकाळीच यामार्गावरील वाहतूक पुढे काढून दिली. रिंगणानंतर पालखी तरडगावला मुक्कामासाठी रवाना झाली आहे.
- शंकर टेमघरे

2 comments:

  1. Anonymous said...

    Mr. Shankar

    Thanks for updations.

    Ganesh Sandbhor  

  2. Anonymous said...

    Shri Shankar Temghare & Sakal Papers,
    Changala Upakram ! Shabdankan Uttam aahe. Vari sobat chalat aslyacha anand milato. Thanks to Sakal & staff.

    Mrs. Veda Bhave  


 

Sakaal Media Group, Pune, India