माऊली पालखीसोबत पंढरीला जाताना जेवढे वारकरी असतात, तेवढे येताना नसतात. जाताना पालखीसमवेत सुमारे अडीच ते तीन लाख भाविक पंढरीची वाट चालतात. आषाढी एकादशीला तर आठ लाख भाविकांच्या गर्दीनं सारं पंढरपूर भरून जातं. एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान पालखीचा मुक्काम असतो, पंढरपुरातील ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात. पोर्णिमेला येथील पालखी परतीला निघते. त्यावेळी मोठ्या श्रद्धने पंढरपूरमधील भाविक माऊलीला निरोप देतात. "माऊली माऊली' चा जयघोष करून मोठ्या आपुलकीनं पुढंच्या वर्षाचं निमंत्रण देतात. पालखी परतीला लागते. आळंदी ते पंढरपूर या दरम्यान सतरा अठरा दिवस लागणारं परतीचं अंतर मात्र, अवघ्या दहा दिवसांत वारकरी पार करतात. आता तुम्ही म्हणाल असं कसं. तर येतानाच्या प्रवासात लहान अंतरांच्या दोन दिवसाचा प्रवास वारकरी एका दिवसात पार करतात. जातानाच्या प्रवासात परतीला देवस्थान आणि चोपदार यांनी नंबर दिलेल्या दिंड्यांना परतीच्या वाटचालीत विणेकरी वारकरीनं चालणं बंधनकारक असतं. त्यामुळं परतीच्या प्रवासात एका दिंडीचा किमान एक किंवा दोन वारकरी असतात. त्यामुळं तीनशे दिंड्यांचे मिळून सहा- सातशे वारकरी असतात. परतीच्या प्रवासातील वाट खडतर समजली जाते, पंढरीला जाताना मोठा जनसमुदाय असतो. मोठा लवाजमा असतो, आणि रोजची सरासरी सतरा- अठरा किलोमीटरची वाटचाल. परतीला मात्र, स्थिती वेगळी असते.

खडतर वाट...
कधी एकदाचं घरी जातोय, होय, अगदी असंच झालं असतं आपल्याला. पंधरा वीस दिवस घराबाहेर राहिल्यावर आपल्यातील कोणाचीही प्रतिक्रिया अशीच असली असती. परंतु, पंढरीच्या सावळ्या विठुचा छंद लागलेल्या परतीच्या वारकऱ्यांना मात्र त्याचं भान नसतं. त्यांना आणखी दहा बारा दिवस घरी जाता येणार नाही. पण, त्यांना त्याचं काही सोयरं सुतक वाटत नाही. माऊलीसोबत पंढरीला घेऊन जायंच अन्‌ माऊलीला पुन्हा आळंदीला आणून सोडायचं, हा नेमधर्म पाळणारा म्हणजे परतीचा निष्ठावंत वारकरी.

परतीला भजनाचा आनंद अधिक
पंढरीला जाताना मोठ्या थाटामाटात अन्‌ ऐश्‍वर्यात जाणारा हा सोहळा परतीला अगदी साधासुधा असतो. परतीला ना नगारा ना अश्‍व अन्‌ ना दिंड्या. यावेळी दिंड्यांतील विणेकऱ्यांसह असतात केवळ पाच- सातशे वारकरी. परतीचा प्रवास तसा खडतर. जातानाचे दोन मुक्काम येताना एका दिवसात पार पाडायचे असतात. त्यामुळं या मंडळीचा दिवस उगवतो, दीडला. दुपारच्या नव्हे, रात्रीच्या दीडला. अंघोळी करून वारकरी वाटेला लागतात. पहाटे दोन ते सकाळी सात-साडेसात या चार- पाच तासांमध्ये सतरा पंधरा सोळा किलोमीटरची वाट वारकरी सहज मागं टाकतात. बरं त्यावेळी रात्र आहे, म्हणून भजन वैगेरे बंद नसतं. पालखीचा रथ निघाला की, भजनाला सुरवात होते. परतीच्या प्रवासात सोहळ्याचे मिळून बहुतांश वेळा एकच भजन असतं. त्यांच्यात एकसुरीपणा अधिक जाणवतो. सकाळची वाट चालल्यानंतर सोहळा थांबतो. त्यावेळी नुकतंच तांबड फटलेलं असतं. त्या गावातंल्या मंडळींना "यांना झोपा आहेत की नाही' असं वाटनं स्वाभाविक आहे. कारण रात्रीरुत्रीचं चालायंच तसं अवघड काम. मात्र, माऊलीमय झालेल्या त्या वारकऱ्यांना रात्र काय आणि दिवस काय, कशाचीच चिंता नसते. कारण, चिंताहारी माऊली माझ्या सोबत आहे, हा विश्‍वास त्यांच्या मनात असतो. सकाळच्या या वाटचालीत वारकरी एखादा विसावा घेतात. त्यावेळी काही गावातील ग्रामस्थ रात्रभर जागून या वाटसरूंना पहाटे चार साडेचारच्या सुमारास चहा देतात. तर काही ठिकाणी पोहे, उपीट, एकच्या सुमारास पुन्हा वाटचाल. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत जेवनासाठी विसावा असतो. घेऊन ही मंडळी पुन्हा चालू लागतात. सायंकाळी सातला वारकरी मुक्कामासाठी विसावतात. पहाटे दोन ते सायंकाळी सात या कालावधीत हे वारकरी किमान पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर मागे टाकतात. परतीला पालखीच्या दर्शनाला गर्दीही नसते. आणि वाहनांची वर्दळही नसते. त्यामुळं वारकऱ्यांना
भजनाचा आनंद मिळते. हा प्रवास वारकऱ्यांना खडतर असला तरी आनंददायी निश्‍चित असतो.

निंदनीय प्रकार
अशीच वाटचाल करीत ही मंडळी आज नातेपुत्यात आलीय. अरे हो, जातानाच्या वाटचालीतला एक किस्सा तुम्हाला सांगायचाच राहिलाय. पंढरपूरला जाताना पालखीचा नातेपुते मुक्कामात घडलेली घटना. झालं असं, की भोई समाज दिंडीचे माऊलींच्या तंबूशेजारीच तंबू असतात. पालखी आली, की या सर्वच गावात जत्रेचं वातावरण असतं. त्या काळात काही टारगट मुलं या गर्दीतून फिरत असतात. अशाच एका मुलानं भोई समाज दिंडीतील एका मुलीची छेड काढली. त्यावेळी त्याच दिंडीतील वारकऱ्यांना या मुलाला चांगलेच खडसावले. झालेल्या अपमानानं चिडून काही वेळानं तो मुलगा वीस पंचवीस मुलांची फौज घेऊन पुन्हा दिंडीपाशी आला. त्यावेळी त्यानं थेट तंबूतील वारकऱ्यांना मारायला सुरवात केली. त्यावेळी दमलेल्या या वारकऱ्यांना चक्क मार खावा लागला. त्यानंतर हे वारकरी देवस्थानच्या कार्यालयात गेले. तेथे पोलिसांच्या सामुपचाराने सारं काही मिटलं. मात्र, हा प्रकार निंदनीय असल्यानं सोहळ्याच्या मालकांनी पुढील वर्षी नातेपुत्यात मुक्काम करायचा नाही,असा निर्णय जाहीर केला. आणि नातेपुतेकरांच्या झोपा उडाल्या. सहा सात तासांच्या आत ग्रामस्थांनी संबंधित मुलांना माफी मागायला लावून पोलिसांच्या स्वाधीन केले. पण, मुक्काम रद्द करू नका अशी गळ घातली. मात्र, या मुक्कामाबाबतचा निर्णय आ पुढच्या वारीच्या वेळीच होणार. अशा प्रकारचा वारकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार दोन तीन वर्षांपासून वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यायला हवा.
-शंकर टेमघरे

वाखरीत आनंद अन्‌ हूरहूरही-
राज्यातील बहुतांश भागातून आलेल्या संतांच्या पालख्या वाखरीत मुक्कामी होत्या. वारकऱ्यांच्या दृष्टिने हा मोठाच योगायोग होता. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. पहाटेपासून लगबग सुरू होती. आज पंढरपूर येणार या आशेने सारे उत्साहीत होते. मी एका वारकऱ्याला विचारलं, काय बाबा झाली का वारी? त्यावर बाबा म्हणाले, "हो, आज व्हईल की. पर वारीतंला आनंद आता पुढच्याच वर्षी. त्यांना वारी संपल्याची हूरहूर मलाही बोलताना जाणवली होती. त्यामुळं मी पुन्हा विचारलं, मग आता घरी कधी? ते म्हणाले, जायचं ना बारस सोडूनं. घरी काय शेती आहे, का विचारलं? ते म्हणाले, दहा बारा एकर हायं. पंधरा दिवस घरचं काय आढवलं नाय. आता एक एक आढवयाला लागलं. घरी असतो, तर पाण्याचा (पावसाची) घोर लागला असता. पर वारीत चाललो, तर कशाचीच काळजी नव्हती.
होय.. अशी माझ्यासह साऱ्यांचीच अवस्था आज होती. वारीत चालताना खरोखर वार, तारीख आठवत नव्हतं. आज पंढरीत जायचा आनंद तर होताच पण वारी संपल्याचं दुःखही होतं. सतरा -अठरा दिवस अनुभवलेला आनंद शब्दात सांगणं शक्‍यच नाही. आ मच्यातही वारी संपल्याची चर्चा होती. आमच्यातील कोणी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मनात हूरहूर होतीच.
----------------------
पत्रकार पडतात जेव्हा तोंडघसी
पुष्पवृष्टी होणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली होती. तशी चौकट सर्व वर्तमानपत्रांनी आजच्या बातमीत केली होती. आम्ही पुष्पवृष्टी होणार असल्यानं सकाळपासूनच तळावर होतो. तेवठ्यात एकानं सांगितलं, पुण्यातून कळाल ंय. हॅलिकॉप्टर उपलब्ध नसल्यानं, पुष्पवृष्टीचं कॅन्सल झालयं. तेवठ्यात आमच्यातील एक जण म्हणाला, ही सुद्धा बातमी आहे. "हॅलिकॉप्टर नसल्याने वनमंत्री पाचपुते तोंडघसी' अशी बातमी होऊ शकते. गेल्या तीन वर्ष केवळ आश्‍वासनाशिवाय काहीही न करणाऱ्या पाचपुतेविषयी हा चांगला विषय मिळाल्यानं सारेच खूष होते. याबाबत आणखी काय काय करता येतील, असा विषय रं गला असतानाच. आकाशात हॅलिकॉप्टर दिसलं. आणि आमची तोंड बघण्यासारखी झाली. मनात आलं, "कसायाला गाय धारजिनी'. त्यानंतर आमच्यातील एकजण म्हणाला, "आता असं करा, पुष्पवृष्टी झाल्यानं पत्रकार तोंडघसी', त्यानं असं सांगताच आमच्यात हस्यकल्लोळ उडाला.
---------------

पालख्यांवर पुष्पवृष्टी
आम्ही सारे पुष्पवृष्टी पाहण्यासाठी बाहेर आलो. तर हॅलिकॉप्टर फार पुढं गेलं. नंतर नंतर तर ते दिसेनासे झालं. आमच्या आशा पुन्हा उंचावल्या. पण काही वेळातचं ते पुन्हा पालख्यांच्या दिशेने आलं. त्यातून पुष्पवृष्टी झालीं. फुले माऊलींच्या तंबूवर पडली. अन्‌ टाळ्याचा कडकडाट झाला. उपस्थितांनी माऊली- माऊलीचा जयघोष केला. दहा- बारा घिरट्या घालताना त्यानं तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्यांवर पुष्पवृष्टी केली. हा सारा प्रकार वारकऱ्यांच्या दृष्टिने वारकऱ्यांना तसा नवीनचं. त्यामुळं त्याबाबत उत्सुकता होती. मागील वर्षी वारीत सहभागी झालेले जुने वारकरी नव्याना मोठ्या उत्साहाने हॅलिकॉप्टरबाबत सांगताना दिसत होते.
सकाळपासून तलावर पंगती पडत होत्या. अकरानंतर ट्रक पंढरपूरमध्ये सोडणार नसल्याचं पोलिसांनी जाहीर केल्यानं साडेआठपासून ठिकठिकाणी जेवणाच्या पंगती पडल्या होत्या.
-----------------

माऊलींच मागे का?
माऊलींची पालखी एक वाजता निघणार होती. मात्र, उशीर झाल्यानं मी विचारलं उशीर का, तर मला सांगण्यात आलं. तुकोबाराय निघायचे आहे. अर्ध्या तासाच्या उशिरानंतर दुपारी दीड माऊलींची पालखी निघाली. तुकोबारायांची पालखी दोनला निघाली. तोपर्यंत माऊलींची पालखी त्याच परिसरात होती.त्यावेळी एका नियोजनातील एका ज्येष्ठ मानकऱ्याला मी विचारलं. तुकोबाराय उशीरा निघणार आहेत, तर मगं आपण पुढं जायला काय हरकत आहे. त्यावर ते सांगू लागले. ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात. तर ती सर्वांची आई आहे. त्यामुळे सर्व संताना पुढं घेऊन मग माऊली मागून चालते. त्याचं हे उत्तर माझ्या दृष्टिनं नवं होतं. त्यासाठी किती उशीर लागला तरी चालेल, शेवटच्या टप्प्यात आई साऱ्या संतांना घेऊन विठुरायाच्या नगरात जाते. ही बाब मला दहा वर्षांच्या काळातही माहित नव्हती.
-----------------

अखेरच्या रिंगणाने उधाण-
पंढरी समिप आल्यानं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. कधी एकदा पंढरपूर येतंय. निम्मे अर्धे वारकरी तर दुपारीच पं ढरीत दाखल झाले होतं. वाखरी- पंढरपूर या दरम्यानचा रस्त्यावर अक्षरशा जनजागर उसळला होता. पालखी विसबावीला आली. तेथे सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण असल्याने तातडीने चोपदारांनी रिंगण लावून घेतले. काही सेंकदात अश्‍वांनी रिंगण पूर्ण केले. पंढरीच्या उंबऱ्यावर आल्याचा आनंद आणि अश्‍वांनी रंगविलेलं रिंगण यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. बाळासाहेब चोपदार यांनी चोप उंचावताच आवाज बंद झाला. आरतीनंतर रिंगणाची सांगता झाली.
---------------------

गळ्यात पादुका घेऊन वाटचाल -
रिंगणानंतर सर्वांत महत्त्वाचा सोहळा असतो तो शितोळे सरकार गळ्यात पादुका घेऊन वारीची वाट चालतात, तो. परंपरेनुसार रिंगण संपल्यावर मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्या. त्यानंतर एका बाजूला वीना घेऊन राजाभाऊ आरफळकर आणि दुसऱ्या बाजूला टाळ घेऊन वासकरमहाराज चालू लागले. हा सोहळा बघताना ुुवारकरी भावूक झाले होते. आम्हीही त्याला अपवाद नव्हते. साऱ्यांच्या मनात विचार एकच होता. असाच असेल का हैबतबाबांचा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा सोहळा. भावनिक वातावणातच वाटचाल सुरू झाली. रात्री पंढरपूरमधील नाथ चौकातील ज्ञानेश्‍वर मंदिरात माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. समाजआरती झाली. आणि वारकरीही विसावले.
--------------------

माऊलीपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे -
शितोळे सरकार, आरफळकर, वासकर हे तिघे चालताना वारकऱ्यांनी तिघांना कडं केलं होतं. त्या तुलनेत या ठिकाणी हवा तेवठा बंदोबस्त नव्हता. तशी चर्चाही सुरू होती. मात्र, स्वयंशिस्तीचा हा सोहळा चालत होता. गर्दीवर दिंडीतील वारकरी नियंत्रित करीत होते. मात्र, उपस्थित जनसागराला थोपविणे अवघड होत होते. दर्शनाला आलेल्या भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केल्याने दिंड्यांना चालण्यासही जागा नव्हती. त्यावेळी एका पोलिसाला विचारलं. पोलिस कुठे आहे. वैतागून तो म्हणाला, मुख्य मंत्री आलेत, त्यांच्या बंदोबस्ताला गेलेत. दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी बंदोबस्त लावावा लागलाय.'' सांगताना तोही पोलिस खात्याच्या कारभारावर चिडलेलाच होता. गर्दीतून वाट काढीत तिघे चालत नाथ चौकात आले. त्यावेळी माझ्या मनात आलं "विठ्ठलाच्या पुजेसाठी हॅलिकॉप्टरने आलेल्या मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्ताला अधिक महत्त्व द्यायचं का अठरा दिवस मैलोनमैल पायी वाटचाल करून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायचं, याचं भान पोलिस खात्याला नको का? या स्थितीत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या धिमतीला होते. माऊलींच्या मात्र नाही. काय हा न्याय. मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याबाबत विषय नाही. त्यांना संरक्षण हवंच. पण माऊलींपैक्षा जास्त असावं का? हे तुम्हीच सांगा. सुदैवानं आणि माऊलींच्या कृपेने म्हणा, काही लाखो भाविकांच्या गर्दीत काही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा, काय झालं असतं, याचं भान पोलिसांनाही हव होतं आणि मुख्यमंत्र्यानाही....
- शंकर टेमघरे

राज्यातील बहुतांश भागातून आलेल्या संतांच्या पालख्या वाखरीत मुक्कामी होत्या. वारकऱ्यांच्या दृष्टिने हा मोठाच योगायोग होता. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. पहाटेपासून लगबग सुरू होती. आज पंढरपूर येणार या आशेने सारे उत्साहीत होते. मी एका वारकऱ्याला विचारलं, काय बाबा झाली का वारी? त्यावर बाबा म्हणाले, "हो, आज व्हईल की. पर वारीतंला आनंद आता पुढच्याच वर्षी. त्यांना वारी संपल्याची हूरहूर मलाही बोलताना जाणवली होती. त्यामुळं मी पुन्हा विचारलं, मग आता घरी कधी? ते म्हणाले, जायचं ना बारस सोडूनं. घरी काय शेती आहे, का विचारलं? ते म्हणाले, दहा बारा एकर हायं. पंधरा दिवस घरचं काय आढवलं नाय. आता एक एक आढवयाला लागलं. घरी असतो, तर पाण्याचा (पावसाची) घोर लागला असता. पर वारीत चाललो, तर कशाचीच काळजी नव्हती.
होय.. अशी माझ्यासह साऱ्यांचीच अवस्था आज होती. वारीत चालताना खरोखर वार, तारीख आठवत नव्हतं. आज पंढरीत जायचा आनंद तर होताच पण वारी संपल्याचं दुःखही होतं. सतरा -अठरा दिवस अनुभवलेला आनंद शब्दात सांगणं शक्‍यच नाही. आ मच्यातही वारी संपल्याची चर्चा होती. आमच्यातील कोणी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मनात हूरहूर होतीच.

पत्रकार पडतात जेव्हा तोंडघसी
पुष्पवृष्टी होणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली होती. तशी चौकट सर्व वर्तमानपत्रांनी आजच्या बातमीत केली होती. आम्ही पुष्पवृष्टी होणार असल्यानं सकाळपासूनच तळावर होतो. तेवठ्यात एकानं सांगितलं, पुण्यातून कळाल ंय. हॅलिकॉप्टर उपलब्ध नसल्यानं, पुष्पवृष्टीचं कॅन्सल झालयं. तेवठ्यात आमच्यातील एक जण म्हणाला, ही सुद्धा बातमी आहे. "हॅलिकॉप्टर नसल्याने वनमंत्री पाचपुते तोंडघसी' अशी बातमी होऊ शकते. गेल्या तीन वर्ष केवळ आश्‍वासनाशिवाय काहीही न करणाऱ्या पाचपुतेविषयी हा चांगला विषय मिळाल्यानं सारेच खूष होते. याबाबत आणखी काय काय करता येतील, असा विषय रं गला असतानाच. आकाशात हॅलिकॉप्टर दिसलं. आणि आमची तोंड बघण्यासारखी झाली. मनात आलं, "कसायाला गाय धारजिनी'. त्यानंतर आमच्यातील एकजण म्हणाला, "आता असं करा, पुष्पवृष्टी झाल्यानं पत्रकार तोंडघसी', त्यानं असं सांगताच आमच्यात हस्यकल्लोळ उडाला.

पालख्यांवर पुष्पवृष्टी
आम्ही सारे पुष्पवृष्टी पाहण्यासाठी बाहेर आलो. तर हॅलिकॉप्टर फार पुढं गेलं. नंतर नंतर तर ते दिसेनासे झालं. आमच्या आशा पुन्हा उंचावल्या. पण काही वेळातचं ते पुन्हा पालख्यांच्या दिशेने आलं. त्यातून पुष्पवृष्टी झालीं. फुले माऊलींच्या तंबूवर पडली. अन्‌ टाळ्याचा कडकडाट झाला. उपस्थितांनी माऊली- माऊलीचा जयघोष केला. दहा- बारा घिरट्या घालताना त्यानं तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्यांवर पुष्पवृष्टी केली. हा सारा प्रकार वारकऱ्यांच्या दृष्टिने वारकऱ्यांना तसा नवीनचं. त्यामुळं त्याबाबत उत्सुकता होती. मागील वर्षी वारीत सहभागी झालेले जुने वारकरी नव्याना मोठ्या उत्साहाने हॅलिकॉप्टरबाबत सांगताना दिसत होते.
सकाळपासून तलावर पंगती पडत होत्या. अकरानंतर ट्रक पंढरपूरमध्ये सोडणार नसल्याचं पोलिसांनी जाहीर केल्यानं साडेआठपासून ठिकठिकाणी जेवणाच्या पंगती पडल्या होत्या.

माऊलींच मागे का?
माऊलींची पालखी एक वाजता निघणार होती. मात्र, उशीर झाल्यानं मी विचारलं उशीर का, तर मला सांगण्यात आलं. तुकोबाराय निघायचे आहे. अर्ध्या तासाच्या उशिरानंतर दुपारी दीड माऊलींची पालखी निघाली. तुकोबारायांची पालखी दोनला निघाली. तोपर्यंत माऊलींची पालखी त्याच परिसरात होती.त्यावेळी एका नियोजनातील एका ज्येष्ठ मानकऱ्याला मी विचारलं. तुकोबाराय उशीरा निघणार आहेत, तर मगं आपण पुढं जायला काय हरकत आहे. त्यावर ते सांगू लागले. ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात. तर ती सर्वांची आई आहे. त्यामुळे सर्व संताना पुढं घेऊन मग माऊली मागून चालते. त्याचं हे उत्तर माझ्या दृष्टिनं नवं होतं. त्यासाठी किती उशीर लागला तरी चालेल, शेवटच्या टप्प्यात आई साऱ्या संतांना घेऊन विठुरायाच्या नगरात जाते. ही बाब मला दहा वर्षांच्या काळातही माहित नव्हती.

अखेरच्या रिंगणाने उधाण
पंढरी समिप आल्यानं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. कधी एकदा पंढरपूर येतंय. निम्मे अर्धे वारकरी तर दुपारीच पं ढरीत दाखल झाले होतं. वाखरी- पंढरपूर या दरम्यानचा रस्त्यावर अक्षरशा जनजागर उसळला होता. पालखी विसबावीला आली. तेथे सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण असल्याने तातडीने चोपदारांनी रिंगण लावून घेतले. काही सेंकदात अश्‍वांनी रिंगण पूर्ण केले. पंढरीच्या उंबऱ्यावर आल्याचा आनंद आणि अश्‍वांनी रंगविलेलं रिंगण यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. बाळासाहेब चोपदार यांनी चोप उंचावताच आवाज बंद झाला. आरतीनंतर रिंगणाची सांगता झाली.

गळ्यात पादुका घेऊन वाटचाल
रिंगणानंतर सर्वांत महत्त्वाचा सोहळा असतो तो शितोळे सरकार गळ्यात पादुका घेऊन वारीची वाट चालतात, तो. परंपरेनुसार रिंगण संपल्यावर मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्या. त्यानंतर एका बाजूला वीना घेऊन राजाभाऊ आरफळकर आणि दुसऱ्या बाजूला टाळ घेऊन वासकरमहाराज चालू लागले. हा सोहळा बघताना ुुवारकरी भावूक झाले होते. आम्हीही त्याला अपवाद नव्हते. साऱ्यांच्या मनात विचार एकच होता. असाच असेल का हैबतबाबांचा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा सोहळा. भावनिक वातावणातच वाटचाल सुरू झाली. रात्री पंढरपूरमधील नाथ चौकातील ज्ञानेश्‍वर मंदिरात माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. समाजआरती झाली. आणि वारकरीही विसावले.

माऊलीपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे
शितोळे सरकार, आरफळकर, वासकर हे तिघे चालताना वारकऱ्यांनी तिघांना कडं केलं होतं. त्या तुलनेत या ठिकाणी हवा तेवठा बंदोबस्त नव्हता. तशी चर्चाही सुरू होती. मात्र, स्वयंशिस्तीचा हा सोहळा चालत होता. गर्दीवर दिंडीतील वारकरी नियंत्रित करीत होते. मात्र, उपस्थित जनसागराला थोपविणे अवघड होत होते. दर्शनाला आलेल्या भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केल्याने दिंड्यांना चालण्यासही जागा नव्हती. त्यावेळी एका पोलिसाला विचारलं. पोलिस कुठे आहे. वैतागून तो म्हणाला, मुख्य मंत्री आलेत, त्यांच्या बंदोबस्ताला गेलेत. दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी बंदोबस्त लावावा लागलाय.'' सांगताना तोही पोलिस खात्याच्या कारभारावर चिडलेलाच होता. गर्दीतून वाट काढीत तिघे चालत नाथ चौकात आले. त्यावेळी माझ्या मनात आलं "विठ्ठलाच्या पुजेसाठी हॅलिकॉप्टरने आलेल्या मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्ताला अधिक महत्त्व द्यायचं का अठरा दिवस मैलोनमैल पायी वाटचाल करून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायचं, याचं भान पोलिस खात्याला नको का? या स्थितीत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या धिमतीला होते. माऊलींच्या मात्र नाही. काय हा न्याय. मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याबाबत विषय नाही. त्यांना संरक्षण हवंच. पण माऊलींपैक्षा जास्त असावं का? हे तुम्हीच सांगा. सुदैवानं आणि माऊलींच्या कृपेने म्हणा, काही लाखो भाविकांच्या गर्दीत काही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा, काय झालं असतं, याचं भान पोलिसांनाही हव होतं आणि मुख्यमंत्र्यानाही....
- शंकर टेमघरे

बिन विषयांची बैठक
माऊलींची पालखी दुपारी एकला निघणार होती. मात्र, काल समाजआरतीत चोपदारांनी भंडीशेगाव तळावर दिंडी संघटनेची बैठक जाहीर करण्यात आली होती. सकाळी नऊला बैठक असल्यानं आम्ही शितोळे सरकारांच्या पालावर पोहोचलो. लोणंदला बैठक न झाल्यानं आज बैठकीत काय होणार यांची आम्हाला उत्सुकता होती. त्यावेळी शेडगे पंच मंडळीच्या दिंडीतील आम्हाला बोलावलं. आम्हाला वाटलं काय तरी बातमीचा विषय असणार म्हणून. पण तेथे गेल्यावर सर्वांच्या समोर आली कांदे भजी. आज काय विशेष वाचारलं. तर त्यांनी सांगितलं, आज कांदेनवमी आहे. त्यामुळे तळावरील बहुतांश दिंड्यांमध्ये सकाळच्या न्याहरीला कांदे भजी करतात. गरम गरम भजी खाऊन आम्ही दिंडी संघटनेच्या बैठकीला बसलो. शितोळे सरकारांच्या पालावर बैठक घेण्याची परंपरा असल्यानं दिंडीकरी मालक बरोबर नऊपासूनच पालासमोर बसले होते. साडेनऊच्या सुमारास मालक राजाभाऊ आरफळकर, विवेकानंद वासकर, राजाभाऊ चोपदार, सोहळाप्रमुख सुधीर पिंपळे आले अन्‌ बैठक सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीचे विषय काय, सचिवांना विचारण्यात आलं, ही बिनविषयाची बैठक आहे. सोहळ्याबाबत काय सुचना असतील त्या कराव्यात, वासकर म्हणाले. त्यावर नारायण पवार यांनी आळंदीतील देऊळवाड्याच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी भाऊ हरपळे यांनी माऊलींच्या सोहळ्याला लागून चालणाऱ्या अन्य पालख्याबाबत आक्षेप घेतला व त्यांच्या स्पिकरसह होणाऱ्या भजनाने दिंडीतील भजनात व्यत्यय येत असल्याच सांगितलं. त्यावेळी अनेक दिंडीकऱ्यांना त्याला अनुमोदन दिले. अन्‌ ठराव करण्यात आला. या पालख्या माऊलींच्या रथाच्या मागे पाच किलोमीटर मागे चालवाव्यात. त्यानंतर बेशिस्त दिंडीकरयांविषयी चर्चा सुरू झाली. सोहळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वानी परंपरेप्रमाणे वागावे, यापुढील काळात बेशिस्त दिंड्यावर क
ारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच दिंड्यामध्ये राजकीय पक्षांच्या प्रचाराचा शिरकाव वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे "फ्लॅक्‍स'वर तसेच वाहनांवरील फलकांवर कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा तसेच दिंडीतील महाराजांचा फोटो असणार नाही. तर संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचेही छायाचित्र लावायचे नाही, असाही ठराव करण्यात आला. यावेळी महाराजांमधील मतभेद बघायला मिळाले. काहीचे म्हणणे होते. काही महाराज मंडळी भिसी गोळा करून केवळ पंधरा दिवसांसाठी दिंडी काढतात. पैसे कमावण्यासाठी करण्यात आलेल्या दिंड्यांवर निर्बंध टाकावेत, तसेच त्यांना काही निकष लावावेत. नव्या महाराज मंडळींमुळे पिढ्यानपिढ्या परंपरा जपणाऱ्यांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या दिंड्यावर कारवाई करण्याचं ठरलं. तसेच वारीच्या वाटेवर चालत कोणीही तंबाकू, गुटखा खाऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आली. अन्नदान करणाऱ्यांवर या बैठकीत झोड उठविण्यात आली. अन्नदान करणाऱ्यांमुळे सोहळ्याच्या पुढे मोकाट समाज चालतो, त्यामुळे पुढील तळावर तसेच परिसरात त्यांच्याकडून घाण केली जाते. त्यामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिंड्या गेल्यानंतर अन्नदान करावे, असे सूचविण्यात आलं. मात्र, त्यावर अंकुश ठेवणे शक्‍य होणार नसल्याचे सांगण्यात आले. स्पिकरबाबत सर्व वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये प्रामुख्याने आळंदी ते पुणे या वाटचालीत मोठ्या प्रमाणात विविध पक्ष संघटना, संस्था वारकऱ्यांना अन्नदान करतात. मात्र, मोठ्या आवाजात स्पिकर लावतात. त्यामुळे दिंड्यांमध्ये शिस्तबद्ध चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भजनात व्यत्यय येतो. त्यामुळे त्याबाबत काही तरी उपाययोजना करण्याबाबत ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय झाला. पुण्यात होणाऱ्या स्वागत तसेच अन्नदानाबाबत वारकरी स
माजाला पूर्ण आदर आहे. मात्र, स्पिकरच्या आवाजामुळे भजनाचा आनंद घेता येत नाही. त्यांनी आवाज कमी ठेवल्यास किंवा न लावताच स्वागत केले. तर आम्हाल आणखी आनंद वाटेल, असं सांगण्यात आलं. अशा विविध चर्चा यावेळी झाली. त्यामध्ये महाराजांमधील मतभेदापासून ते ज्ञानेश्‍वर महाराजांच्या सोहळ्याचे वैभव राखण्यासाठी घ्यावयच्या काळजीपर्यंतच्या चर्चा झाल्या. कोणत्या ना कोणत्या विषयांने नेहमी वादग्रस्त होणारी ही बैठक आज अगदीच खेळीमेळीच्या वातावरणात झाली. वादावादीचे मुद्दे उपस्थित होत असणाऱ्या या बैठकीत आज पत्रकारांना काहीच मिळालं नव्हते.
-शंकर टेमघरे

बंधूभेटीने वारकरी गहिवरले
तोडल्यापासून टप्पा म्हणून ठिकाण पाच किलोमीटरवर आहे. तेथे शुक्रवारी सायंकाळी माऊली- सोपानदेव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आम्ही निघालो. पण, जेवण खूप झाल्यानं कोणालाही चालण आता जमणार नव्हतं. आम्ही गाडीत बसून टप्प्यावर गेलो. तेथे माऊलींच्या पालखीचा रथ साडेचारच्या सुमारास आला. त्यापाठोपाठ पंधरा मिनिटांच्या अंतरानं सोपानकाकांचा रथ आला. दोन्ही रथ एकमेकांना चिटकून उभे करण्यात आलं. दोन्ही देवस्थान, मानकऱ्यांकडून एकमेकांना नारळ- प्रसाद देण्यात आला. यावेळी सोपानकाकाच्या सोहळ्याबरोबर आलेल्या भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर माऊलीच्या सोहळ्यातील भाविकांनी सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. बंधूभेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे प्रचंड गर्दी झाली होती. तोफांनी सलामी देण्यात आली. तसेच दोन्ही संताचा जयजयकार केला. बंधूभेटीच्या या सोहळ्यानं दोन्ही सोहळ्यातील वारकरी गहिवरलेले होते. त्याकाळात समाजातील अनिष्ठ प्रवृत्तीच्या विचारांच्या लोकांनी या भावडांना स्वीकारले नाही. आणि हाच समाज आज या भावडांच्या पालख्या काढून गर्दी करतात. याच विचारांनी माझं मन सुन्न झालं होतं. का वागतात अशी लोक, अशा प्रश्‍न मला पडला होता. त्यातचं पुन्हा चालायला लागलो.

आम्ही चहा घ्यायला गेलो, आमच्यातील एकानं चहावाल्याला नाव विचारले. त्यानं सुधीर संकपाळ असं नाव सागितलं. गाव विचारलं. त्यावर त्यांन बार्शीचा असल्याचं सांगितलं. आम्ही पत्रकार असल्याचं समजल्यावर त्यानं विचारलं साहेब, डी. फार्मसीचा निकाल लागला का हो?

त्यावर मी म्हणलो, कोण आहे, फार्मसीला, मीच साहेब, तो म्हणाला. फार्मसी झालायं मग इथं कसा तू, त्यावर तो म्हणाला, वारीत जगायला नाय तर वागायला कसं ते शिकवलं जातं. वारीची परंपरा आहे, का असं विचारलं असता तो म्हणाला, परंपरा नाय, पण आमचं घर माळकरी आहे. गावाकडं पाऊस झाला नाय, अन्‌ नोकरी मागायला गेलो, तर दुचाकी असेल, तर नोकरी मिळंल, असं सांगितलं. त्यामुळं वारीला यायचं ठरवलं. त्यानंतर वारीत हडपसरमध्ये सामील झालो. दोन दिवसांनंतर एक ठिकाणी पोलिसांचा लाथा खाल्ल्या. त्यावेळी वाटलं परत जावं. पण नंतर असं वाटलं, आपण तर तमाशाला तर जात नाहीत ना. बघू काय होईल, ते होईल. म्हणून निघालो.

किमान पाचशे कप गेले तरी समाधानी हाय साहेब, पण सातशे हजार कप होतात. त्यामुळे या वारीत दहा एक हजार होतील, घरी पाच- सहा हजार आहेत. त्यामुळं गाडी घेऊन नोकरीला लागायचं ठरवलंय. अन्‌ नोकरी चांगली लागली तर बी. फार्मसी करायचीय....सुधीरची कथा ऐकून मन गलबललं...

वारी कुणाकुणाला काय काय देते...याचं आणखी एक दर्शन झालं...


दही- धपाट्यांवर ताव

तोडलं- बोडलं तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थ माऊलींची सोहळ्यातील वारकऱ्यांना दरवर्षी जेऊ घालता. येथे दरवर्षी ठरलेला मेनू असतो. दही- धपाटेचा. पालखी थांबताच गावात विविध ठिकाणी वारकऱ्याच्या जेवणाच्या पंगती बसलेल्या दिसत होत्या. सकाळचा नाष्टा खूप झाल्यानं आमच्यातील नवीन गॅंग जेवण करण्याच्या मनस्थितीत नव्हते. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, पण त्यांना माहित येथील गावरान बेत माहित नव्हता. मीही त्यांच्याबरोबरच नाष्टा केला होता, पण दही- धपाटे खाल्ले नाही, तर वारीत काय खाल्लं, असं वाटल्याशिवाय राहिलं नसतं. मी त्यांना म्हणालो, वासकर महाराजांनी बोलावलयं, नुसतं बरोबर चला, वाटल्यास जेऊ नका. गर्दीतून वाट काढीत आम्ही वासकरांच पाल गाठलं. गेल्या गेल्याच महाराजांनी आतील मानसांना आवाज दिला, "पत्रकार आलेत, त्यांना पहिलं जेवायला वाढा,' आम्ही जुनी मंडळी लगेच पंगतीला बसलो, नवे गडी जेवायला नको म्हणाले. त्यानंतर महाराजांनी "थोडं थोडं खा' असा आग्रह धरल्यानं सारेच बसलो. वाढायला सुरवात झाली. दही धपाटे, ठेचा, पिढलं, भाकरी, हुसळ, घरी बनवलेलं लोणचं, खीर आणि भात असा पदार्थ ताटात आले." नको नको' म्हणेपर्यत ग्रामस्थांनी ताटातून वाढून ठेवलंही होतं. जेवण सुरू झाल्यावर मात्र, चित्र बदलल होत. दही धपाट्याची आडवा हात मारण्यात जेवन नको म्हणणारेही आघाडीवर होते. कारण त्यांची चव काय औरच होती. जेवण झाल्यावर नव्या लोकांनी मला धारेवर धरलं. "इथे एवढं चागलं मेनू असतो, हे आम्हाला आधी माहित असते तर आम्ही दीड तासापूर्वी हॉटेलचा नाष्टा केला नसता. तू आधी सांगितलं का सांगितलं नाही. नाष्टा केला नसता तर आणखी दोन- तीन धपाटे खायला मिळाले असते.' त्यांनी मला विचारलेल्या जाबाचे माझ्याकडं उत्तर नव्हतं. मी त्यांना म्हणालो, तुमचं बरोबर आहे, माझंच चुकलं. आता पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, इथं येताना सकाळ
चा नाष्टा करायचा नाही. तृप्त मनाने आम्ही गाडीत जाऊन बसलो.

नंदाच्या ओढ्यात सोहळा न्हाला
शुक्रवारी सकाळी रिंगणाजवळ भजी- पाव, वडा- पावची न्याहरी केली अन्‌ वाटचाल सुरू केली. दरवर्षी ठरल्याप्रमाणे दुपारचं जेवण वासकरांच्या तंबूवर होतं. बाराच्या सुमारास आम्ही तोडल्यात पोहोचलो. तेथे तोफांची सलामीने माऊलींचे स्वागत करण्यात आलं. तोडलं आणि बोडलं ही दोन गावं नंदाच्या ओढ्यानं जोडली गेलीत. दरवर्षी या ओढ्यातील पाण्यातून पालखी नेण्यात येते. पाऊस नसल्यास ओढ्याला कॅनॉलमधून पाणी सोडण्यात येतं. त्यानुसार आजही पाणी सोडण्यात आलं होतं. साडेबाराच्या सुमारास ग्रामस्थांनी पालखी या ओढ्यातून पलिकडं नेली. यावेळी पालखीतील पादुकांवर पाणी उडविण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडते. त्यामुळे ओढ्यातून पालखी ओलांडेपर्यंत लांबून पाण्याचे फवारे उडाल्याचा भास होतो. सकाळपासून ढगाळ हवामानामुळे वारकरी घामाने डबडबलेले होते. तसेच पाऊस नसल्याने वारकरी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविताना दिसले. तर काहींनी डुबकी मारून आंघोळ्याही केल्या. पालखी कट्ट्यावर ठेवली तसे आम्हीही वासकरांच्या दिंडीकडे निघालो.

- शंकर टेमघरे

रिंगणापेक्षा उडीचा खेळ रंगला
शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने वेळापूर सोडलं. आम्ही सोहळ्याबरोबर ठाकूरबुवाच्या समाधी मंदिराजवळ रिंगणाच्या ठिकाणी पोहोचलो. येथील काळ्याभोर शेतात हे रिंगण होणार होतं. दोन्ही बाजूंना उसाचं पीक आणि हे शेत मात्र तसंच होत. त्यावेळी मी विचारलं. हे शेत रिंगणासाठी आरक्षित केलं आहे का? माझ्या या प्रश्‍नाने एका ग्रामस्थाने सांगितले. ""आरक्षण बिरक्षण काही नाय, हे खासगी शेत हाय. हा शेतकरी माऊली आपल्या शेतात येतीय, वारकऱ्यांसोबतीनं खेळतीय म्हणून वारी पुढं गेल्यावर तो शेतकरी पेरणी करतोया. माऊलींच्या पाहुणी येतेय, म्हणून तो हा हंगाम सोडून देतोया. अन्‌ हो दुसऱ्या दोन हंगामात त्याला बक्‍कळ फायदा होतुया.''

त्याच्याशी गप्पा मारताना रिंगण कधी सुरू झालं मला कळलंही नाही. सदाशिवनगर आणि खुडूस फाट्यावरील रिंगणात अश्‍वांचा अनुभव पाहता, मी रिंगण बाहेरूनच पाहण्याचा निर्णय घेतला. अश्‍वांनी काही क्षणात चार फेऱ्या मारल्या. अन्‌ रिंगण मोडलं. सर्वच रिंगणामध्ये दिंड्यांमधील खेळ बघून झालं होते. त्यामुळं मी माझा मोर्चा उडीच्या कार्यक्रमाकडं वळवला. तोपर्यंत दिंड्यांमधील टाळकरी, पखवाजवादक अगदी तयारीतंच आले होते. मालक राजभाऊ आरफळकर, संतांनाना चोपदार, राजाभाऊ चोपदार यांच्या इशाऱ्यावर उडीचा खेळ सुरू झाला. उडीचा खेळ म्हणजे माऊलींच्या पालखी शेजारी पुन्हा वारकऱ्यांचे खेळ. पण इथे जुंगलबंदी बघायला मिळते. पाच सहाशे टाळकरी आणि पन्नासएक पखवाजवादक होते. विलंबित तालात "ज्ञानोबा- माऊली' भजन सुरू झालं. मालक, चोपदार हाताच्या इशाऱ्याने टाळकरी आणि पखवाजवादक यांना ताल धरायला लावत होते. पाच- सात मिनिटे झाली, पण टाळांचा आणि पखवाजवादकांचा सूर जुळेना. पखवाजवादक वेगवेगळे बोल वाजत असल्याने टाळाचा आणि पखवाजाचा सूर बिघडत होता. अखेरी झाली, पण भजन, टाळ, आणि पखवाजाचा सूर काय जुळेना. अखेर चिडलेल्या संतानाना चोपदाराने भजन थांबवलं, आणि पखवाज गळ्यात घातलं. अन्य पखवाजवादकांना संतानाने खडसावून सांगितलं, "धिं दा ग धा ग धिं धा ग ता' हाच बोल सर्वाना वाजवायलाय. तो आदेश संतानानाचा असल्याने पखवाजवादकांनी तो वाजवला, आणि भजन रंगत गेलं. त्यानंतर उत्साह एवढा वाढला की, संतानानाने अश्‍व उडीच्या खेळात अश्‍वांना पळविण्यासाठी बोलावून घेतले. माऊली नामाच्या दमदार ठेक्‍यात अश्‍वांना सोडण्यात आले. अश्‍वांनी काही क्षणात पाच फेऱ्या पूर्ण केल्या. या वर्षी गोल रिंगणात अश्‍व पळताना माझं समाधान झालं नव्हतं. मोठ्या रिंगणापेक्षा उडीचा खेळात रमलेले वारकरी आणि अश्‍वांनी मारलेल्या पाच फेऱ्या मनाला आनंद देणाऱयाच ठरल्या.

- शंकर टेमघरे

गुरुवारी सोहळा माळशिरस मुक्कामी असताना आम्ही अकलूजमध्ये मुक्कामी होतो. सकाळी उठून खुडूस फाट्यावरील रिंगण पाहाण्यासाठी आम्ही पहाटे पाचलाच उठलो होतो. आवरून रिंगणात गेलो. माऊलींची पालखी नऊच्या सुमारास खुडूसच्या मैदानावर आली. येथील मैदान लहान असल्याने रिंगण लावण्यासाठी तसा उशीरच झाला. या वर्षी माऊलींचा तसेच, स्वाराचा अश्‍व हे दोन्ही रेसचे घोडे आहेत. त्यामुळे रिंगणात पळताना त्यांचा वेगही अधिक असतो. या पार्श्‍वभूमीवर हे रिंगण कमी वाटत होते. चोपदारांनी रिंगण लावले आणि अश्‍व सोडण्यात आले. या वेळी माऊलींच्या नामाच्या जयघोषाने सारा आसमंत दणाणून गेला. अतिउत्साही भाविक मधेच उठल्याने माऊलींचा अश्‍व बिचकला, आणि भाविकांमध्ये घुसला. तीन ते चार लोकांच्या अंगावर गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुन्हा अश्‍वांना रिंगणात सोडण्यात आले. अश्‍वांनी दोन फेऱ्या मारून रिंगण रंगविले. साऱ्यांप्रमाणे मीही या रिंगणाचा आनंद अनुभवला. मात्र, अश्‍व भाविकात घुसल्याची घटना माझ्या मनातून गेली नव्हती. भाविकांत घुसलेला अश्‍व तसाच धावत राहिला असता, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, या विचारांनी मी घाबरून गेलो होतो. त्यामुळे जखमी झालेल्या भाविकांना भेटण्याची माझी इच्छा झाली. त्यामध्ये 65 वयाच्या वृद्ध महिलेच्या पायावर अश्‍वाची टाच लागली होती. मी जाऊन विचारले, आजी जास्त लागले का? तर, ती उत्तरली...नाय माऊलींचा पाय नुसताच घासून गेलाय. लोक टापांखालची माती घेण्यासाठी तडफडतायत...अन्‌ मला त्याचा पाय लागला म्हणून काय झालं..?तिच्या या उत्तराने मी पुरता स्तिमित झालो होतो. तत्क्षणी मला असं जाणवलं की काय ही अंधश्रद्धा..? आणि मी चालू लागलो. एक- दोन किलोमीटरनंतर मला तीच महिला चालताना दिसली. त्या वेळी मला असे जाणवले, की माऊलींचा पाय पडला, तरी त्यात स्वत:ला धन्य समजणे ही माझ्या दृष
्टीने अंधश्रद्धा होती. पण, एवढे मोठे संकट येऊनही न डगमगता पुन्हा वारीची वाट धरून चालायचे, ही केवढी श्रद्धा...!


एरव्ही किरकोळ जखम झाली, तरी तिचा बाऊ केला जातो. मात्र, इक्षे प्रसंग जीवावर बेतला असतानाही तिचा माऊलींवरचा दृढ विश्‍वास तसूभरही कमी झाला नाही. हे सर्व बळ श्रद्धेचेच असू शकते.
- शंकर टेमघरे

वासुदेवाशी बोलणं संपत आलं तसा माऊलींचा पालखी सोहळा मांडवे ओढ्यावर विसावला होता. रिंगणाचा सोहळा असल्यानं भाविकांचे डोळे सदाशिवनगरला होते. रिंगण दुपारी दोन वाजता होते. मात्र, सकाळी दहापासूनच भाविकांनी जागा धरून ठेवल्या होत्या. जेवणाचा कार्यक्रम उरकून पालखी दोन वाजता रिंगणाच्या परिसरात आली. चोपदारांनी दिंड्या लावून घेतल्या. माऊलींचा अश्व आणि पालखी दिंड्यातून वाट काढून रिंगणाच्या मधोमध आली. अश्वांना धावण्याच्या रिंगणात नेले. माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पदमजा देवी मोहिते पाटील यांनी पालखीची पुजा केली. अश्वांना हार अर्पण केले. दरम्यानच्या काळात पताकाधारी वारकऱयांनी पालखीच्याकडेने दाटी केली होती. मुख्य सोहळा पाहण्यासाठी वारकरी आसुसले होते.

सव्वा दोनच्या सुमारास चोपदाऱांच्या इशाऱयानंतर भोपळे दिंडीतील मानकऱयाने रिंगणाला तीन फेऱया मांडल्या. त्यानंतर उद्धव चोपदार याने माऊलींच्या अश्वाला रिंगण दाखविले. त्यापाठोपाठ स्वाराच्या अश्वानं एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाला रिंगणात सोडण्यात आले. दोन्ही स्वारांनी काहीक्षणात रिंगणाला तीन फेऱया घातल्या. यावेळी माऊली नामाच्या गजरानं आसमंत दणाणून गेला होता. रिंगण संपताच टापांखालील माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱयांची झुंबड उडाली.

दरम्यानच्या काळात अश्वांनी रंगवलेल्या रिंगणाचा आनंद दिंड्या-दिंड्यांमधून दिसत होता. पारंपरीक खेळ रंगले होते. वास्करांच्या दिंडीत नेहमीप्रमाणे राजकाऱयांचा गलका होता. विवेकानंद वास्कर, प्रतापसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते यांनी फुगडी खेळली. त्यानंतर साऱयांच्याच आग्रहानं प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पदमजादेवी मोहिते पाटील यांनीही फुगडी खेळली. बबनराव पाचपुते आणि त्यांच्या सौ. पाचपुते यांचीही फुगडी रंगली. सारं राजकारण बाजुला ठेवून रंगलेला हा खेळ या नेत्यांनी अगदी मनापासून खेळला हे खरं...!

हा आनंद घेऊनच सोहळा पुढे मार्गस्थ झाला. रात्री सात वाजता सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचला.

माऊलींचा सोहळा सकाळी साडेसहाला नातेपुतेहून मार्गस्थ झाला. आम्ही मात्र उशिरा उठल्यानं साडे आठला रस्त्याला लागलो. माऊलींचा रथ गाठण्यासाठी आम्ही गाडीतून जायचं ठरवलं. जाताना दिंड्यांमध्ये वासुदेव नाचताना दिसला. त्याच्याशी बोलायचं ठरवलं, पण रथ गाठण्यासाठी गाडी सोडता येत नव्हती. त्यामुळं त्याला आम्ही गाडीतच घेतलं. त्याच्याशी झालेलं बोलणं त्याच्याच शब्दात इथं देतोयः

मी मुळचा अकोल्याचा. पंधरा दिवसांची वाटचाल करून आळंदीला आलो. तिथून वारीसोबत चालतोय, या वासुदेवानं सांगितलं...

अकोल्यातल्या कॉलेजात शिपाई म्हणून कामाला होतो. पर्मनंट करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्यामुळं मी बाहेर पडलो. त्यानंतर गुलाबराव महाराजांकडे गेलो. तेथे त्यांनी वासुदेवाचं शिक्षण दिलं. त्यावरच सध्या उदरनिर्वाह चालतोय. वर्षातून दहा महिने घराबाहेर असतो. या काळात बाहेर फिरून होईल तेवढे पैसे घरी मनी ऑर्डरनं पाठवतोय.

वारी बावीस वर्षांपासून करतोय. वारीसारखं सुख नाही. या सोहळ्यात हरिनामाचा गजर करायला तर मिळतोच आणि आर्थिक उत्पन्नही दोन-अडिच हजाराच्या घरात जातं.

मंदिर, पोलीस ठाण्याच्याबाहेर झोपतो...वासुदेवाचं मुख्य काम प्रबोधन करणं हे आहे. त्याप्रमाणं मी नाशिक परिसरात अधिकाधिक काळ हे काम करतो. ज्या घराबाहेर तुळशी वृंदावन आहे, तिथंच भिक्षा मागायची हा नेम आहे. अनेकदा बाहेर नागरीकांचा त्रासही होतो. दारुडे, गावातील टारगट मुलं त्रास देतात. त्यामुळं पोलीस ठाण्याचा आश्रय घेऊन रात्री मुक्काम करतो.

मंगळवारी रात्रीच नातेपुतेमध्ये असं झालं...मी एका घराबाहेर थांबलो असताना एकानं विचारलं, काय करतो रे. मी सांगितलं, थोडं सावलीत थांबलोय. ऊन जास्त आहे. थोड्या वेळानं जाईन इथून. त्यावर त्या माणसानं काठीच काढली...मी म्हणालो, तु कितीही मार, मी प्रतिकार करणार नाही. हे सारं बोलणं, एक वृद्ध महिला एेकत होती. तिला राहावलं नाही. ती समोर आली आणि तिनं त्या माणसाला दरडावलं. या वृद्धेमध्ये मला माऊलीचं दर्शन झालं...


या वासुदेवासारखे लाखो वारकरी असं माणसांत देव शोधतात...आणि सोप्या शब्दांत अध्यात्माचा अर्थ सांगतात...

माऊलींचे पहिले गोल रिंगण बुधवारी दुपारी अलोट वारकऱयांच्या साक्षीनं झालं..माऊलींच्या पालखीच्या अश्वानं तीन फेऱया पूर्ण करून लाखो वारकऱयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले...

वारीच्या वाटेवर हा सोहळा अविस्मरणीय असतो. अनेकदा वारी करणाऱायंनाही या सोहळ्याची ओढ असते.

बुधवारी दुपारीही ही ओढ प्रत्येक वारकऱयांमध्ये जाणवत होती.


 

Sakaal Media Group, Pune, India