tag:blogger.com,1999:blog-2542080696706208762024-02-21T02:40:44.807+05:30विठ्ठल...विठ्ठल...sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.comBlogger36125tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-47092462085204707672008-07-20T19:29:00.002+05:302008-07-21T19:12:04.174+05:30परतीच्या प्रवासाबाबत थोडस...माऊली पालखीसोबत पंढरीला जाताना जेवढे वारकरी असतात, तेवढे येताना नसतात. जाताना पालखीसमवेत सुमारे अडीच ते तीन लाख भाविक पंढरीची वाट चालतात. आषाढी एकादशीला तर आठ लाख भाविकांच्या गर्दीनं सारं पंढरपूर भरून जातं. एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान पालखीचा मुक्काम असतो, पंढरपुरातील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात. पोर्णिमेला येथील पालखी परतीला निघते. त्यावेळी मोठ्या श्रद्धने पंढरपूरमधील भाविक माऊलीला निरोप देतात. "माऊली माऊली' चा जयघोष करून मोठ्या आपुलकीनं पुढंच्या वर्षाचं निमंत्रण देतात. पालखी परतीला लागते. आळंदी ते पंढरपूर या दरम्यान सतरा अठरा दिवस लागणारं परतीचं अंतर मात्र, अवघ्या दहा दिवसांत वारकरी पार करतात. आता तुम्ही म्हणाल असं कसं. तर येतानाच्या प्रवासात लहान अंतरांच्या दोन दिवसाचा प्रवास वारकरी एका दिवसात पार करतात. जातानाच्या प्रवासात परतीला देवस्थान आणि चोपदार यांनी नंबर दिलेल्या दिंड्यांना परतीच्या वाटचालीत विणेकरी वारकरीनं चालणं बंधनकारक असतं. त्यामुळं परतीच्या प्रवासात एका दिंडीचा किमान एक किंवा दोन वारकरी असतात. त्यामुळं तीनशे दिंड्यांचे मिळून सहा- सातशे वारकरी असतात. परतीच्या प्रवासातील वाट खडतर समजली जाते, पंढरीला जाताना मोठा जनसमुदाय असतो. मोठा लवाजमा असतो, आणि रोजची सरासरी सतरा- अठरा किलोमीटरची वाटचाल. परतीला मात्र, स्थिती वेगळी असते. <br /><br />खडतर वाट... <br />कधी एकदाचं घरी जातोय, होय, अगदी असंच झालं असतं आपल्याला. पंधरा वीस दिवस घराबाहेर राहिल्यावर आपल्यातील कोणाचीही प्रतिक्रिया अशीच असली असती. परंतु, पंढरीच्या सावळ्या विठुचा छंद लागलेल्या परतीच्या वारकऱ्यांना मात्र त्याचं भान नसतं. त्यांना आणखी दहा बारा दिवस घरी जाता येणार नाही. पण, त्यांना त्याचं काही सोयरं सुतक वाटत नाही. माऊलीसोबत पंढरीला घेऊन जायंच अन् माऊलीला पुन्हा आळंदीला आणून सोडायचं, हा नेमधर्म पाळणारा म्हणजे परतीचा निष्ठावंत वारकरी.<br /><br />परतीला भजनाचा आनंद अधिक<br />पंढरीला जाताना मोठ्या थाटामाटात अन् ऐश्वर्यात जाणारा हा सोहळा परतीला अगदी साधासुधा असतो. परतीला ना नगारा ना अश्व अन् ना दिंड्या. यावेळी दिंड्यांतील विणेकऱ्यांसह असतात केवळ पाच- सातशे वारकरी. परतीचा प्रवास तसा खडतर. जातानाचे दोन मुक्काम येताना एका दिवसात पार पाडायचे असतात. त्यामुळं या मंडळीचा दिवस उगवतो, दीडला. दुपारच्या नव्हे, रात्रीच्या दीडला. अंघोळी करून वारकरी वाटेला लागतात. पहाटे दोन ते सकाळी सात-साडेसात या चार- पाच तासांमध्ये सतरा पंधरा सोळा किलोमीटरची वाट वारकरी सहज मागं टाकतात. बरं त्यावेळी रात्र आहे, म्हणून भजन वैगेरे बंद नसतं. पालखीचा रथ निघाला की, भजनाला सुरवात होते. परतीच्या प्रवासात सोहळ्याचे मिळून बहुतांश वेळा एकच भजन असतं. त्यांच्यात एकसुरीपणा अधिक जाणवतो. सकाळची वाट चालल्यानंतर सोहळा थांबतो. त्यावेळी नुकतंच तांबड फटलेलं असतं. त्या गावातंल्या मंडळींना "यांना झोपा आहेत की नाही' असं वाटनं स्वाभाविक आहे. कारण रात्रीरुत्रीचं चालायंच तसं अवघड काम. मात्र, माऊलीमय झालेल्या त्या वारकऱ्यांना रात्र काय आणि दिवस काय, कशाचीच चिंता नसते. कारण, चिंताहारी माऊली माझ्या सोबत आहे, हा विश्वास त्यांच्या मनात असतो. सकाळच्या या वाटचालीत वारकरी एखादा विसावा घेतात. त्यावेळी काही गावातील ग्रामस्थ रात्रभर जागून या वाटसरूंना पहाटे चार साडेचारच्या सुमारास चहा देतात. तर काही ठिकाणी पोहे, उपीट, एकच्या सुमारास पुन्हा वाटचाल. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत जेवनासाठी विसावा असतो. घेऊन ही मंडळी पुन्हा चालू लागतात. सायंकाळी सातला वारकरी मुक्कामासाठी विसावतात. पहाटे दोन ते सायंकाळी सात या कालावधीत हे वारकरी किमान पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर मागे टाकतात. परतीला पालखीच्या दर्शनाला गर्दीही नसते. आणि वाहनांची वर्दळही नसते. त्यामुळं वारकऱ्यांना <br />भजनाचा आनंद मिळते. हा प्रवास वारकऱ्यांना खडतर असला तरी आनंददायी निश्चित असतो.<br /><br />निंदनीय प्रकार<br />अशीच वाटचाल करीत ही मंडळी आज नातेपुत्यात आलीय. अरे हो, जातानाच्या वाटचालीतला एक किस्सा तुम्हाला सांगायचाच राहिलाय. पंढरपूरला जाताना पालखीचा नातेपुते मुक्कामात घडलेली घटना. झालं असं, की भोई समाज दिंडीचे माऊलींच्या तंबूशेजारीच तंबू असतात. पालखी आली, की या सर्वच गावात जत्रेचं वातावरण असतं. त्या काळात काही टारगट मुलं या गर्दीतून फिरत असतात. अशाच एका मुलानं भोई समाज दिंडीतील एका मुलीची छेड काढली. त्यावेळी त्याच दिंडीतील वारकऱ्यांना या मुलाला चांगलेच खडसावले. झालेल्या अपमानानं चिडून काही वेळानं तो मुलगा वीस पंचवीस मुलांची फौज घेऊन पुन्हा दिंडीपाशी आला. त्यावेळी त्यानं थेट तंबूतील वारकऱ्यांना मारायला सुरवात केली. त्यावेळी दमलेल्या या वारकऱ्यांना चक्क मार खावा लागला. त्यानंतर हे वारकरी देवस्थानच्या कार्यालयात गेले. तेथे पोलिसांच्या सामुपचाराने सारं काही मिटलं. मात्र, हा प्रकार निंदनीय असल्यानं सोहळ्याच्या मालकांनी पुढील वर्षी नातेपुत्यात मुक्काम करायचा नाही,असा निर्णय जाहीर केला. आणि नातेपुतेकरांच्या झोपा उडाल्या. सहा सात तासांच्या आत ग्रामस्थांनी संबंधित मुलांना माफी मागायला लावून पोलिसांच्या स्वाधीन केले. पण, मुक्काम रद्द करू नका अशी गळ घातली. मात्र, या मुक्कामाबाबतचा निर्णय आ पुढच्या वारीच्या वेळीच होणार. अशा प्रकारचा वारकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार दोन तीन वर्षांपासून वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यायला हवा. <br />-शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-40173172089564875722008-07-14T21:41:00.001+05:302008-07-14T21:41:41.742+05:30सोमवार, १४ जुलै - सायंकाळीवाखरीत आनंद अन् हूरहूरही-<br />राज्यातील बहुतांश भागातून आलेल्या संतांच्या पालख्या वाखरीत मुक्कामी होत्या. वारकऱ्यांच्या दृष्टिने हा मोठाच योगायोग होता. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. पहाटेपासून लगबग सुरू होती. आज पंढरपूर येणार या आशेने सारे उत्साहीत होते. मी एका वारकऱ्याला विचारलं, काय बाबा झाली का वारी? त्यावर बाबा म्हणाले, "हो, आज व्हईल की. पर वारीतंला आनंद आता पुढच्याच वर्षी. त्यांना वारी संपल्याची हूरहूर मलाही बोलताना जाणवली होती. त्यामुळं मी पुन्हा विचारलं, मग आता घरी कधी? ते म्हणाले, जायचं ना बारस सोडूनं. घरी काय शेती आहे, का विचारलं? ते म्हणाले, दहा बारा एकर हायं. पंधरा दिवस घरचं काय आढवलं नाय. आता एक एक आढवयाला लागलं. घरी असतो, तर पाण्याचा (पावसाची) घोर लागला असता. पर वारीत चाललो, तर कशाचीच काळजी नव्हती. <br />होय.. अशी माझ्यासह साऱ्यांचीच अवस्था आज होती. वारीत चालताना खरोखर वार, तारीख आठवत नव्हतं. आज पंढरीत जायचा आनंद तर होताच पण वारी संपल्याचं दुःखही होतं. सतरा -अठरा दिवस अनुभवलेला आनंद शब्दात सांगणं शक्यच नाही. आ मच्यातही वारी संपल्याची चर्चा होती. आमच्यातील कोणी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मनात हूरहूर होतीच. <br />----------------------<br />पत्रकार पडतात जेव्हा तोंडघसी<br />पुष्पवृष्टी होणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली होती. तशी चौकट सर्व वर्तमानपत्रांनी आजच्या बातमीत केली होती. आम्ही पुष्पवृष्टी होणार असल्यानं सकाळपासूनच तळावर होतो. तेवठ्यात एकानं सांगितलं, पुण्यातून कळाल ंय. हॅलिकॉप्टर उपलब्ध नसल्यानं, पुष्पवृष्टीचं कॅन्सल झालयं. तेवठ्यात आमच्यातील एक जण म्हणाला, ही सुद्धा बातमी आहे. "हॅलिकॉप्टर नसल्याने वनमंत्री पाचपुते तोंडघसी' अशी बातमी होऊ शकते. गेल्या तीन वर्ष केवळ आश्वासनाशिवाय काहीही न करणाऱ्या पाचपुतेविषयी हा चांगला विषय मिळाल्यानं सारेच खूष होते. याबाबत आणखी काय काय करता येतील, असा विषय रं गला असतानाच. आकाशात हॅलिकॉप्टर दिसलं. आणि आमची तोंड बघण्यासारखी झाली. मनात आलं, "कसायाला गाय धारजिनी'. त्यानंतर आमच्यातील एकजण म्हणाला, "आता असं करा, पुष्पवृष्टी झाल्यानं पत्रकार तोंडघसी', त्यानं असं सांगताच आमच्यात हस्यकल्लोळ उडाला. <br />---------------<br /><br />पालख्यांवर पुष्पवृष्टी<br />आम्ही सारे पुष्पवृष्टी पाहण्यासाठी बाहेर आलो. तर हॅलिकॉप्टर फार पुढं गेलं. नंतर नंतर तर ते दिसेनासे झालं. आमच्या आशा पुन्हा उंचावल्या. पण काही वेळातचं ते पुन्हा पालख्यांच्या दिशेने आलं. त्यातून पुष्पवृष्टी झालीं. फुले माऊलींच्या तंबूवर पडली. अन् टाळ्याचा कडकडाट झाला. उपस्थितांनी माऊली- माऊलीचा जयघोष केला. दहा- बारा घिरट्या घालताना त्यानं तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्यांवर पुष्पवृष्टी केली. हा सारा प्रकार वारकऱ्यांच्या दृष्टिने वारकऱ्यांना तसा नवीनचं. त्यामुळं त्याबाबत उत्सुकता होती. मागील वर्षी वारीत सहभागी झालेले जुने वारकरी नव्याना मोठ्या उत्साहाने हॅलिकॉप्टरबाबत सांगताना दिसत होते. <br />सकाळपासून तलावर पंगती पडत होत्या. अकरानंतर ट्रक पंढरपूरमध्ये सोडणार नसल्याचं पोलिसांनी जाहीर केल्यानं साडेआठपासून ठिकठिकाणी जेवणाच्या पंगती पडल्या होत्या. <br />-----------------<br /><br />माऊलींच मागे का?<br />माऊलींची पालखी एक वाजता निघणार होती. मात्र, उशीर झाल्यानं मी विचारलं उशीर का, तर मला सांगण्यात आलं. तुकोबाराय निघायचे आहे. अर्ध्या तासाच्या उशिरानंतर दुपारी दीड माऊलींची पालखी निघाली. तुकोबारायांची पालखी दोनला निघाली. तोपर्यंत माऊलींची पालखी त्याच परिसरात होती.त्यावेळी एका नियोजनातील एका ज्येष्ठ मानकऱ्याला मी विचारलं. तुकोबाराय उशीरा निघणार आहेत, तर मगं आपण पुढं जायला काय हरकत आहे. त्यावर ते सांगू लागले. ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात. तर ती सर्वांची आई आहे. त्यामुळे सर्व संताना पुढं घेऊन मग माऊली मागून चालते. त्याचं हे उत्तर माझ्या दृष्टिनं नवं होतं. त्यासाठी किती उशीर लागला तरी चालेल, शेवटच्या टप्प्यात आई साऱ्या संतांना घेऊन विठुरायाच्या नगरात जाते. ही बाब मला दहा वर्षांच्या काळातही माहित नव्हती. <br />-----------------<br /><br />अखेरच्या रिंगणाने उधाण-<br />पंढरी समिप आल्यानं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. कधी एकदा पंढरपूर येतंय. निम्मे अर्धे वारकरी तर दुपारीच पं ढरीत दाखल झाले होतं. वाखरी- पंढरपूर या दरम्यानचा रस्त्यावर अक्षरशा जनजागर उसळला होता. पालखी विसबावीला आली. तेथे सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण असल्याने तातडीने चोपदारांनी रिंगण लावून घेतले. काही सेंकदात अश्वांनी रिंगण पूर्ण केले. पंढरीच्या उंबऱ्यावर आल्याचा आनंद आणि अश्वांनी रंगविलेलं रिंगण यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. बाळासाहेब चोपदार यांनी चोप उंचावताच आवाज बंद झाला. आरतीनंतर रिंगणाची सांगता झाली.<br />---------------------<br /><br />गळ्यात पादुका घेऊन वाटचाल -<br />रिंगणानंतर सर्वांत महत्त्वाचा सोहळा असतो तो शितोळे सरकार गळ्यात पादुका घेऊन वारीची वाट चालतात, तो. परंपरेनुसार रिंगण संपल्यावर मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्या. त्यानंतर एका बाजूला वीना घेऊन राजाभाऊ आरफळकर आणि दुसऱ्या बाजूला टाळ घेऊन वासकरमहाराज चालू लागले. हा सोहळा बघताना ुुवारकरी भावूक झाले होते. आम्हीही त्याला अपवाद नव्हते. साऱ्यांच्या मनात विचार एकच होता. असाच असेल का हैबतबाबांचा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा सोहळा. भावनिक वातावणातच वाटचाल सुरू झाली. रात्री पंढरपूरमधील नाथ चौकातील ज्ञानेश्वर मंदिरात माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. समाजआरती झाली. आणि वारकरीही विसावले.<br />--------------------<br /><br />माऊलीपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे -<br />शितोळे सरकार, आरफळकर, वासकर हे तिघे चालताना वारकऱ्यांनी तिघांना कडं केलं होतं. त्या तुलनेत या ठिकाणी हवा तेवठा बंदोबस्त नव्हता. तशी चर्चाही सुरू होती. मात्र, स्वयंशिस्तीचा हा सोहळा चालत होता. गर्दीवर दिंडीतील वारकरी नियंत्रित करीत होते. मात्र, उपस्थित जनसागराला थोपविणे अवघड होत होते. दर्शनाला आलेल्या भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केल्याने दिंड्यांना चालण्यासही जागा नव्हती. त्यावेळी एका पोलिसाला विचारलं. पोलिस कुठे आहे. वैतागून तो म्हणाला, मुख्य मंत्री आलेत, त्यांच्या बंदोबस्ताला गेलेत. दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी बंदोबस्त लावावा लागलाय.'' सांगताना तोही पोलिस खात्याच्या कारभारावर चिडलेलाच होता. गर्दीतून वाट काढीत तिघे चालत नाथ चौकात आले. त्यावेळी माझ्या मनात आलं "विठ्ठलाच्या पुजेसाठी हॅलिकॉप्टरने आलेल्या मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्ताला अधिक महत्त्व द्यायचं का अठरा दिवस मैलोनमैल पायी वाटचाल करून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायचं, याचं भान पोलिस खात्याला नको का? या स्थितीत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या धिमतीला होते. माऊलींच्या मात्र नाही. काय हा न्याय. मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याबाबत विषय नाही. त्यांना संरक्षण हवंच. पण माऊलींपैक्षा जास्त असावं का? हे तुम्हीच सांगा. सुदैवानं आणि माऊलींच्या कृपेने म्हणा, काही लाखो भाविकांच्या गर्दीत काही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा, काय झालं असतं, याचं भान पोलिसांनाही हव होतं आणि मुख्यमंत्र्यानाही....<br />- शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-47482963684891480282008-07-13T20:51:00.001+05:302008-07-13T20:51:37.661+05:30रविवार, १३ जुलै- रात्री आठ वाजताराज्यातील बहुतांश भागातून आलेल्या संतांच्या पालख्या वाखरीत मुक्कामी होत्या. वारकऱ्यांच्या दृष्टिने हा मोठाच योगायोग होता. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. पहाटेपासून लगबग सुरू होती. आज पंढरपूर येणार या आशेने सारे उत्साहीत होते. मी एका वारकऱ्याला विचारलं, काय बाबा झाली का वारी? त्यावर बाबा म्हणाले, "हो, आज व्हईल की. पर वारीतंला आनंद आता पुढच्याच वर्षी. त्यांना वारी संपल्याची हूरहूर मलाही बोलताना जाणवली होती. त्यामुळं मी पुन्हा विचारलं, मग आता घरी कधी? ते म्हणाले, जायचं ना बारस सोडूनं. घरी काय शेती आहे, का विचारलं? ते म्हणाले, दहा बारा एकर हायं. पंधरा दिवस घरचं काय आढवलं नाय. आता एक एक आढवयाला लागलं. घरी असतो, तर पाण्याचा (पावसाची) घोर लागला असता. पर वारीत चाललो, तर कशाचीच काळजी नव्हती. <br />होय.. अशी माझ्यासह साऱ्यांचीच अवस्था आज होती. वारीत चालताना खरोखर वार, तारीख आठवत नव्हतं. आज पंढरीत जायचा आनंद तर होताच पण वारी संपल्याचं दुःखही होतं. सतरा -अठरा दिवस अनुभवलेला आनंद शब्दात सांगणं शक्यच नाही. आ मच्यातही वारी संपल्याची चर्चा होती. आमच्यातील कोणी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मनात हूरहूर होतीच. <br /><br />पत्रकार पडतात जेव्हा तोंडघसी<br />पुष्पवृष्टी होणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली होती. तशी चौकट सर्व वर्तमानपत्रांनी आजच्या बातमीत केली होती. आम्ही पुष्पवृष्टी होणार असल्यानं सकाळपासूनच तळावर होतो. तेवठ्यात एकानं सांगितलं, पुण्यातून कळाल ंय. हॅलिकॉप्टर उपलब्ध नसल्यानं, पुष्पवृष्टीचं कॅन्सल झालयं. तेवठ्यात आमच्यातील एक जण म्हणाला, ही सुद्धा बातमी आहे. "हॅलिकॉप्टर नसल्याने वनमंत्री पाचपुते तोंडघसी' अशी बातमी होऊ शकते. गेल्या तीन वर्ष केवळ आश्वासनाशिवाय काहीही न करणाऱ्या पाचपुतेविषयी हा चांगला विषय मिळाल्यानं सारेच खूष होते. याबाबत आणखी काय काय करता येतील, असा विषय रं गला असतानाच. आकाशात हॅलिकॉप्टर दिसलं. आणि आमची तोंड बघण्यासारखी झाली. मनात आलं, "कसायाला गाय धारजिनी'. त्यानंतर आमच्यातील एकजण म्हणाला, "आता असं करा, पुष्पवृष्टी झाल्यानं पत्रकार तोंडघसी', त्यानं असं सांगताच आमच्यात हस्यकल्लोळ उडाला. <br /><br />पालख्यांवर पुष्पवृष्टी<br />आम्ही सारे पुष्पवृष्टी पाहण्यासाठी बाहेर आलो. तर हॅलिकॉप्टर फार पुढं गेलं. नंतर नंतर तर ते दिसेनासे झालं. आमच्या आशा पुन्हा उंचावल्या. पण काही वेळातचं ते पुन्हा पालख्यांच्या दिशेने आलं. त्यातून पुष्पवृष्टी झालीं. फुले माऊलींच्या तंबूवर पडली. अन् टाळ्याचा कडकडाट झाला. उपस्थितांनी माऊली- माऊलीचा जयघोष केला. दहा- बारा घिरट्या घालताना त्यानं तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्यांवर पुष्पवृष्टी केली. हा सारा प्रकार वारकऱ्यांच्या दृष्टिने वारकऱ्यांना तसा नवीनचं. त्यामुळं त्याबाबत उत्सुकता होती. मागील वर्षी वारीत सहभागी झालेले जुने वारकरी नव्याना मोठ्या उत्साहाने हॅलिकॉप्टरबाबत सांगताना दिसत होते. <br />सकाळपासून तलावर पंगती पडत होत्या. अकरानंतर ट्रक पंढरपूरमध्ये सोडणार नसल्याचं पोलिसांनी जाहीर केल्यानं साडेआठपासून ठिकठिकाणी जेवणाच्या पंगती पडल्या होत्या. <br /><br />माऊलींच मागे का?<br />माऊलींची पालखी एक वाजता निघणार होती. मात्र, उशीर झाल्यानं मी विचारलं उशीर का, तर मला सांगण्यात आलं. तुकोबाराय निघायचे आहे. अर्ध्या तासाच्या उशिरानंतर दुपारी दीड माऊलींची पालखी निघाली. तुकोबारायांची पालखी दोनला निघाली. तोपर्यंत माऊलींची पालखी त्याच परिसरात होती.त्यावेळी एका नियोजनातील एका ज्येष्ठ मानकऱ्याला मी विचारलं. तुकोबाराय उशीरा निघणार आहेत, तर मगं आपण पुढं जायला काय हरकत आहे. त्यावर ते सांगू लागले. ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात. तर ती सर्वांची आई आहे. त्यामुळे सर्व संताना पुढं घेऊन मग माऊली मागून चालते. त्याचं हे उत्तर माझ्या दृष्टिनं नवं होतं. त्यासाठी किती उशीर लागला तरी चालेल, शेवटच्या टप्प्यात आई साऱ्या संतांना घेऊन विठुरायाच्या नगरात जाते. ही बाब मला दहा वर्षांच्या काळातही माहित नव्हती. <br /><br />अखेरच्या रिंगणाने उधाण<br />पंढरी समिप आल्यानं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. कधी एकदा पंढरपूर येतंय. निम्मे अर्धे वारकरी तर दुपारीच पं ढरीत दाखल झाले होतं. वाखरी- पंढरपूर या दरम्यानचा रस्त्यावर अक्षरशा जनजागर उसळला होता. पालखी विसबावीला आली. तेथे सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण असल्याने तातडीने चोपदारांनी रिंगण लावून घेतले. काही सेंकदात अश्वांनी रिंगण पूर्ण केले. पंढरीच्या उंबऱ्यावर आल्याचा आनंद आणि अश्वांनी रंगविलेलं रिंगण यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. बाळासाहेब चोपदार यांनी चोप उंचावताच आवाज बंद झाला. आरतीनंतर रिंगणाची सांगता झाली.<br /><br />गळ्यात पादुका घेऊन वाटचाल<br />रिंगणानंतर सर्वांत महत्त्वाचा सोहळा असतो तो शितोळे सरकार गळ्यात पादुका घेऊन वारीची वाट चालतात, तो. परंपरेनुसार रिंगण संपल्यावर मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्या. त्यानंतर एका बाजूला वीना घेऊन राजाभाऊ आरफळकर आणि दुसऱ्या बाजूला टाळ घेऊन वासकरमहाराज चालू लागले. हा सोहळा बघताना ुुवारकरी भावूक झाले होते. आम्हीही त्याला अपवाद नव्हते. साऱ्यांच्या मनात विचार एकच होता. असाच असेल का हैबतबाबांचा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा सोहळा. भावनिक वातावणातच वाटचाल सुरू झाली. रात्री पंढरपूरमधील नाथ चौकातील ज्ञानेश्वर मंदिरात माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. समाजआरती झाली. आणि वारकरीही विसावले.<br /><br />माऊलीपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे<br />शितोळे सरकार, आरफळकर, वासकर हे तिघे चालताना वारकऱ्यांनी तिघांना कडं केलं होतं. त्या तुलनेत या ठिकाणी हवा तेवठा बंदोबस्त नव्हता. तशी चर्चाही सुरू होती. मात्र, स्वयंशिस्तीचा हा सोहळा चालत होता. गर्दीवर दिंडीतील वारकरी नियंत्रित करीत होते. मात्र, उपस्थित जनसागराला थोपविणे अवघड होत होते. दर्शनाला आलेल्या भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केल्याने दिंड्यांना चालण्यासही जागा नव्हती. त्यावेळी एका पोलिसाला विचारलं. पोलिस कुठे आहे. वैतागून तो म्हणाला, मुख्य मंत्री आलेत, त्यांच्या बंदोबस्ताला गेलेत. दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी बंदोबस्त लावावा लागलाय.'' सांगताना तोही पोलिस खात्याच्या कारभारावर चिडलेलाच होता. गर्दीतून वाट काढीत तिघे चालत नाथ चौकात आले. त्यावेळी माझ्या मनात आलं "विठ्ठलाच्या पुजेसाठी हॅलिकॉप्टरने आलेल्या मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्ताला अधिक महत्त्व द्यायचं का अठरा दिवस मैलोनमैल पायी वाटचाल करून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायचं, याचं भान पोलिस खात्याला नको का? या स्थितीत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या धिमतीला होते. माऊलींच्या मात्र नाही. काय हा न्याय. मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याबाबत विषय नाही. त्यांना संरक्षण हवंच. पण माऊलींपैक्षा जास्त असावं का? हे तुम्हीच सांगा. सुदैवानं आणि माऊलींच्या कृपेने म्हणा, काही लाखो भाविकांच्या गर्दीत काही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा, काय झालं असतं, याचं भान पोलिसांनाही हव होतं आणि मुख्यमंत्र्यानाही....<br />- शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-16965289900118319842008-07-12T21:22:00.001+05:302008-07-12T21:28:15.489+05:30शनिवार, बारा जुलै- रात्री साडे नऊ वाजताबिन विषयांची बैठक<br />माऊलींची पालखी दुपारी एकला निघणार होती. मात्र, काल समाजआरतीत चोपदारांनी भंडीशेगाव तळावर दिंडी संघटनेची बैठक जाहीर करण्यात आली होती. सकाळी नऊला बैठक असल्यानं आम्ही शितोळे सरकारांच्या पालावर पोहोचलो. लोणंदला बैठक न झाल्यानं आज बैठकीत काय होणार यांची आम्हाला उत्सुकता होती. त्यावेळी शेडगे पंच मंडळीच्या दिंडीतील आम्हाला बोलावलं. आम्हाला वाटलं काय तरी बातमीचा विषय असणार म्हणून. पण तेथे गेल्यावर सर्वांच्या समोर आली कांदे भजी. आज काय विशेष वाचारलं. तर त्यांनी सांगितलं, आज कांदेनवमी आहे. त्यामुळे तळावरील बहुतांश दिंड्यांमध्ये सकाळच्या न्याहरीला कांदे भजी करतात. गरम गरम भजी खाऊन आम्ही दिंडी संघटनेच्या बैठकीला बसलो. शितोळे सरकारांच्या पालावर बैठक घेण्याची परंपरा असल्यानं दिंडीकरी मालक बरोबर नऊपासूनच पालासमोर बसले होते. साडेनऊच्या सुमारास मालक राजाभाऊ आरफळकर, विवेकानंद वासकर, राजाभाऊ चोपदार, सोहळाप्रमुख सुधीर पिंपळे आले अन् बैठक सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीचे विषय काय, सचिवांना विचारण्यात आलं, ही बिनविषयाची बैठक आहे. सोहळ्याबाबत काय सुचना असतील त्या कराव्यात, वासकर म्हणाले. त्यावर नारायण पवार यांनी आळंदीतील देऊळवाड्याच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी भाऊ हरपळे यांनी माऊलींच्या सोहळ्याला लागून चालणाऱ्या अन्य पालख्याबाबत आक्षेप घेतला व त्यांच्या स्पिकरसह होणाऱ्या भजनाने दिंडीतील भजनात व्यत्यय येत असल्याच सांगितलं. त्यावेळी अनेक दिंडीकऱ्यांना त्याला अनुमोदन दिले. अन् ठराव करण्यात आला. या पालख्या माऊलींच्या रथाच्या मागे पाच किलोमीटर मागे चालवाव्यात. त्यानंतर बेशिस्त दिंडीकरयांविषयी चर्चा सुरू झाली. सोहळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वानी परंपरेप्रमाणे वागावे, यापुढील काळात बेशिस्त दिंड्यावर क<br />ारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच दिंड्यामध्ये राजकीय पक्षांच्या प्रचाराचा शिरकाव वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे "फ्लॅक्स'वर तसेच वाहनांवरील फलकांवर कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा तसेच दिंडीतील महाराजांचा फोटो असणार नाही. तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचेही छायाचित्र लावायचे नाही, असाही ठराव करण्यात आला. यावेळी महाराजांमधील मतभेद बघायला मिळाले. काहीचे म्हणणे होते. काही महाराज मंडळी भिसी गोळा करून केवळ पंधरा दिवसांसाठी दिंडी काढतात. पैसे कमावण्यासाठी करण्यात आलेल्या दिंड्यांवर निर्बंध टाकावेत, तसेच त्यांना काही निकष लावावेत. नव्या महाराज मंडळींमुळे पिढ्यानपिढ्या परंपरा जपणाऱ्यांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या दिंड्यावर कारवाई करण्याचं ठरलं. तसेच वारीच्या वाटेवर चालत कोणीही तंबाकू, गुटखा खाऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आली. अन्नदान करणाऱ्यांवर या बैठकीत झोड उठविण्यात आली. अन्नदान करणाऱ्यांमुळे सोहळ्याच्या पुढे मोकाट समाज चालतो, त्यामुळे पुढील तळावर तसेच परिसरात त्यांच्याकडून घाण केली जाते. त्यामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिंड्या गेल्यानंतर अन्नदान करावे, असे सूचविण्यात आलं. मात्र, त्यावर अंकुश ठेवणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले. स्पिकरबाबत सर्व वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये प्रामुख्याने आळंदी ते पुणे या वाटचालीत मोठ्या प्रमाणात विविध पक्ष संघटना, संस्था वारकऱ्यांना अन्नदान करतात. मात्र, मोठ्या आवाजात स्पिकर लावतात. त्यामुळे दिंड्यांमध्ये शिस्तबद्ध चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भजनात व्यत्यय येतो. त्यामुळे त्याबाबत काही तरी उपाययोजना करण्याबाबत ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय झाला. पुण्यात होणाऱ्या स्वागत तसेच अन्नदानाबाबत वारकरी स<br />माजाला पूर्ण आदर आहे. मात्र, स्पिकरच्या आवाजामुळे भजनाचा आनंद घेता येत नाही. त्यांनी आवाज कमी ठेवल्यास किंवा न लावताच स्वागत केले. तर आम्हाल आणखी आनंद वाटेल, असं सांगण्यात आलं. अशा विविध चर्चा यावेळी झाली. त्यामध्ये महाराजांमधील मतभेदापासून ते ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याचे वैभव राखण्यासाठी घ्यावयच्या काळजीपर्यंतच्या चर्चा झाल्या. कोणत्या ना कोणत्या विषयांने नेहमी वादग्रस्त होणारी ही बैठक आज अगदीच खेळीमेळीच्या वातावरणात झाली. वादावादीचे मुद्दे उपस्थित होत असणाऱ्या या बैठकीत आज पत्रकारांना काहीच मिळालं नव्हते.<br />-शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-41658067763605484962008-07-12T12:48:00.001+05:302008-07-12T12:51:04.648+05:30शनिवार, बारा जुलै, सकाळी पाऊण वाजता<span style="font-weight:bold;">बंधूभेटीने वारकरी गहिवरले<br /><span style="font-style:italic;"></span></span>तोडल्यापासून टप्पा म्हणून ठिकाण पाच किलोमीटरवर आहे. तेथे शुक्रवारी सायंकाळी माऊली- सोपानदेव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आम्ही निघालो. पण, जेवण खूप झाल्यानं कोणालाही चालण आता जमणार नव्हतं. आम्ही गाडीत बसून टप्प्यावर गेलो. तेथे माऊलींच्या पालखीचा रथ साडेचारच्या सुमारास आला. त्यापाठोपाठ पंधरा मिनिटांच्या अंतरानं सोपानकाकांचा रथ आला. दोन्ही रथ एकमेकांना चिटकून उभे करण्यात आलं. दोन्ही देवस्थान, मानकऱ्यांकडून एकमेकांना नारळ- प्रसाद देण्यात आला. यावेळी सोपानकाकाच्या सोहळ्याबरोबर आलेल्या भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर माऊलीच्या सोहळ्यातील भाविकांनी सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. बंधूभेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे प्रचंड गर्दी झाली होती. तोफांनी सलामी देण्यात आली. तसेच दोन्ही संताचा जयजयकार केला. बंधूभेटीच्या या सोहळ्यानं दोन्ही सोहळ्यातील वारकरी गहिवरलेले होते. त्याकाळात समाजातील अनिष्ठ प्रवृत्तीच्या विचारांच्या लोकांनी या भावडांना स्वीकारले नाही. आणि हाच समाज आज या भावडांच्या पालख्या काढून गर्दी करतात. याच विचारांनी माझं मन सुन्न झालं होतं. का वागतात अशी लोक, अशा प्रश्न मला पडला होता. त्यातचं पुन्हा चालायला लागलो.<br /><br />आम्ही चहा घ्यायला गेलो, आमच्यातील एकानं चहावाल्याला नाव विचारले. त्यानं सुधीर संकपाळ असं नाव सागितलं. गाव विचारलं. त्यावर त्यांन बार्शीचा असल्याचं सांगितलं. आम्ही पत्रकार असल्याचं समजल्यावर त्यानं विचारलं साहेब, डी. फार्मसीचा निकाल लागला का हो? <br /><br />त्यावर मी म्हणलो, कोण आहे, फार्मसीला, मीच साहेब, तो म्हणाला. फार्मसी झालायं मग इथं कसा तू, त्यावर तो म्हणाला, वारीत जगायला नाय तर वागायला कसं ते शिकवलं जातं. वारीची परंपरा आहे, का असं विचारलं असता तो म्हणाला, परंपरा नाय, पण आमचं घर माळकरी आहे. गावाकडं पाऊस झाला नाय, अन् नोकरी मागायला गेलो, तर दुचाकी असेल, तर नोकरी मिळंल, असं सांगितलं. त्यामुळं वारीला यायचं ठरवलं. त्यानंतर वारीत हडपसरमध्ये सामील झालो. दोन दिवसांनंतर एक ठिकाणी पोलिसांचा लाथा खाल्ल्या. त्यावेळी वाटलं परत जावं. पण नंतर असं वाटलं, आपण तर तमाशाला तर जात नाहीत ना. बघू काय होईल, ते होईल. म्हणून निघालो. <br /><br />किमान पाचशे कप गेले तरी समाधानी हाय साहेब, पण सातशे हजार कप होतात. त्यामुळे या वारीत दहा एक हजार होतील, घरी पाच- सहा हजार आहेत. त्यामुळं गाडी घेऊन नोकरीला लागायचं ठरवलंय. अन् नोकरी चांगली लागली तर बी. फार्मसी करायचीय....सुधीरची कथा ऐकून मन गलबललं...<br /><br />वारी कुणाकुणाला काय काय देते...याचं आणखी एक दर्शन झालं...<br /><br /><span style="font-weight:bold;"><br />दही- धपाट्यांवर ताव<span style="font-style:italic;"></span></span><br />तोडलं- बोडलं तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थ माऊलींची सोहळ्यातील वारकऱ्यांना दरवर्षी जेऊ घालता. येथे दरवर्षी ठरलेला मेनू असतो. दही- धपाटेचा. पालखी थांबताच गावात विविध ठिकाणी वारकऱ्याच्या जेवणाच्या पंगती बसलेल्या दिसत होत्या. सकाळचा नाष्टा खूप झाल्यानं आमच्यातील नवीन गॅंग जेवण करण्याच्या मनस्थितीत नव्हते. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, पण त्यांना माहित येथील गावरान बेत माहित नव्हता. मीही त्यांच्याबरोबरच नाष्टा केला होता, पण दही- धपाटे खाल्ले नाही, तर वारीत काय खाल्लं, असं वाटल्याशिवाय राहिलं नसतं. मी त्यांना म्हणालो, वासकर महाराजांनी बोलावलयं, नुसतं बरोबर चला, वाटल्यास जेऊ नका. गर्दीतून वाट काढीत आम्ही वासकरांच पाल गाठलं. गेल्या गेल्याच महाराजांनी आतील मानसांना आवाज दिला, "पत्रकार आलेत, त्यांना पहिलं जेवायला वाढा,' आम्ही जुनी मंडळी लगेच पंगतीला बसलो, नवे गडी जेवायला नको म्हणाले. त्यानंतर महाराजांनी "थोडं थोडं खा' असा आग्रह धरल्यानं सारेच बसलो. वाढायला सुरवात झाली. दही धपाटे, ठेचा, पिढलं, भाकरी, हुसळ, घरी बनवलेलं लोणचं, खीर आणि भात असा पदार्थ ताटात आले." नको नको' म्हणेपर्यत ग्रामस्थांनी ताटातून वाढून ठेवलंही होतं. जेवण सुरू झाल्यावर मात्र, चित्र बदलल होत. दही धपाट्याची आडवा हात मारण्यात जेवन नको म्हणणारेही आघाडीवर होते. कारण त्यांची चव काय औरच होती. जेवण झाल्यावर नव्या लोकांनी मला धारेवर धरलं. "इथे एवढं चागलं मेनू असतो, हे आम्हाला आधी माहित असते तर आम्ही दीड तासापूर्वी हॉटेलचा नाष्टा केला नसता. तू आधी सांगितलं का सांगितलं नाही. नाष्टा केला नसता तर आणखी दोन- तीन धपाटे खायला मिळाले असते.' त्यांनी मला विचारलेल्या जाबाचे माझ्याकडं उत्तर नव्हतं. मी त्यांना म्हणालो, तुमचं बरोबर आहे, माझंच चुकलं. आता पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, इथं येताना सकाळ<br />चा नाष्टा करायचा नाही. तृप्त मनाने आम्ही गाडीत जाऊन बसलो. <br /><br /><span style="font-weight:bold;">नंदाच्या ओढ्यात सोहळा न्हाला<br /><span style="font-style:italic;"></span></span>शुक्रवारी सकाळी रिंगणाजवळ भजी- पाव, वडा- पावची न्याहरी केली अन् वाटचाल सुरू केली. दरवर्षी ठरल्याप्रमाणे दुपारचं जेवण वासकरांच्या तंबूवर होतं. बाराच्या सुमारास आम्ही तोडल्यात पोहोचलो. तेथे तोफांची सलामीने माऊलींचे स्वागत करण्यात आलं. तोडलं आणि बोडलं ही दोन गावं नंदाच्या ओढ्यानं जोडली गेलीत. दरवर्षी या ओढ्यातील पाण्यातून पालखी नेण्यात येते. पाऊस नसल्यास ओढ्याला कॅनॉलमधून पाणी सोडण्यात येतं. त्यानुसार आजही पाणी सोडण्यात आलं होतं. साडेबाराच्या सुमारास ग्रामस्थांनी पालखी या ओढ्यातून पलिकडं नेली. यावेळी पालखीतील पादुकांवर पाणी उडविण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडते. त्यामुळे ओढ्यातून पालखी ओलांडेपर्यंत लांबून पाण्याचे फवारे उडाल्याचा भास होतो. सकाळपासून ढगाळ हवामानामुळे वारकरी घामाने डबडबलेले होते. तसेच पाऊस नसल्याने वारकरी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविताना दिसले. तर काहींनी डुबकी मारून आंघोळ्याही केल्या. पालखी कट्ट्यावर ठेवली तसे आम्हीही वासकरांच्या दिंडीकडे निघालो. <br /><br /><span style="font-weight:bold;">- शंकर टेमघरे <span style="font-style:italic;"></span></span>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-67977679823803030892008-07-12T12:40:00.005+05:302008-07-12T12:49:39.690+05:30शनिवार, बारा जुलै, दुपारी पाऊण वाजता<span style="font-style:italic;">रिंगणापेक्षा उडीचा खेळ रंगला<br /><span style="font-weight:bold;"></span></span>शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने वेळापूर सोडलं. आम्ही सोहळ्याबरोबर ठाकूरबुवाच्या समाधी मंदिराजवळ रिंगणाच्या ठिकाणी पोहोचलो. येथील काळ्याभोर शेतात हे रिंगण होणार होतं. दोन्ही बाजूंना उसाचं पीक आणि हे शेत मात्र तसंच होत. त्यावेळी मी विचारलं. हे शेत रिंगणासाठी आरक्षित केलं आहे का? माझ्या या प्रश्नाने एका ग्रामस्थाने सांगितले. ""आरक्षण बिरक्षण काही नाय, हे खासगी शेत हाय. हा शेतकरी माऊली आपल्या शेतात येतीय, वारकऱ्यांसोबतीनं खेळतीय म्हणून वारी पुढं गेल्यावर तो शेतकरी पेरणी करतोया. माऊलींच्या पाहुणी येतेय, म्हणून तो हा हंगाम सोडून देतोया. अन् हो दुसऱ्या दोन हंगामात त्याला बक्कळ फायदा होतुया.''<br /><br />त्याच्याशी गप्पा मारताना रिंगण कधी सुरू झालं मला कळलंही नाही. सदाशिवनगर आणि खुडूस फाट्यावरील रिंगणात अश्वांचा अनुभव पाहता, मी रिंगण बाहेरूनच पाहण्याचा निर्णय घेतला. अश्वांनी काही क्षणात चार फेऱ्या मारल्या. अन् रिंगण मोडलं. सर्वच रिंगणामध्ये दिंड्यांमधील खेळ बघून झालं होते. त्यामुळं मी माझा मोर्चा उडीच्या कार्यक्रमाकडं वळवला. तोपर्यंत दिंड्यांमधील टाळकरी, पखवाजवादक अगदी तयारीतंच आले होते. मालक राजभाऊ आरफळकर, संतांनाना चोपदार, राजाभाऊ चोपदार यांच्या इशाऱ्यावर उडीचा खेळ सुरू झाला. उडीचा खेळ म्हणजे माऊलींच्या पालखी शेजारी पुन्हा वारकऱ्यांचे खेळ. पण इथे जुंगलबंदी बघायला मिळते. पाच सहाशे टाळकरी आणि पन्नासएक पखवाजवादक होते. विलंबित तालात "ज्ञानोबा- माऊली' भजन सुरू झालं. मालक, चोपदार हाताच्या इशाऱ्याने टाळकरी आणि पखवाजवादक यांना ताल धरायला लावत होते. पाच- सात मिनिटे झाली, पण टाळांचा आणि पखवाजवादकांचा सूर जुळेना. पखवाजवादक वेगवेगळे बोल वाजत असल्याने टाळाचा आणि पखवाजाचा सूर बिघडत होता. अखेरी झाली, पण भजन, टाळ, आणि पखवाजाचा सूर काय जुळेना. अखेर चिडलेल्या संतानाना चोपदाराने भजन थांबवलं, आणि पखवाज गळ्यात घातलं. अन्य पखवाजवादकांना संतानाने खडसावून सांगितलं, "धिं दा ग धा ग धिं धा ग ता' हाच बोल सर्वाना वाजवायलाय. तो आदेश संतानानाचा असल्याने पखवाजवादकांनी तो वाजवला, आणि भजन रंगत गेलं. त्यानंतर उत्साह एवढा वाढला की, संतानानाने अश्व उडीच्या खेळात अश्वांना पळविण्यासाठी बोलावून घेतले. माऊली नामाच्या दमदार ठेक्यात अश्वांना सोडण्यात आले. अश्वांनी काही क्षणात पाच फेऱ्या पूर्ण केल्या. या वर्षी गोल रिंगणात अश्व पळताना माझं समाधान झालं नव्हतं. मोठ्या रिंगणापेक्षा उडीचा खेळात रमलेले वारकरी आणि अश्वांनी मारलेल्या पाच फेऱ्या मनाला आनंद देणाऱयाच ठरल्या.<br /><span style="font-style:italic;"><br />- शंकर टेमघरे</span>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-1447268823693118912008-07-10T19:27:00.000+05:302008-07-10T19:29:29.560+05:30गुरुवार, अकरा जुलै- सायंकाळी साडे सात वाजतागुरुवारी सोहळा माळशिरस मुक्कामी असताना आम्ही अकलूजमध्ये मुक्कामी होतो. सकाळी उठून खुडूस फाट्यावरील रिंगण पाहाण्यासाठी आम्ही पहाटे पाचलाच उठलो होतो. आवरून रिंगणात गेलो. माऊलींची पालखी नऊच्या सुमारास खुडूसच्या मैदानावर आली. येथील मैदान लहान असल्याने रिंगण लावण्यासाठी तसा उशीरच झाला. या वर्षी माऊलींचा तसेच, स्वाराचा अश्व हे दोन्ही रेसचे घोडे आहेत. त्यामुळे रिंगणात पळताना त्यांचा वेगही अधिक असतो. या पार्श्वभूमीवर हे रिंगण कमी वाटत होते. चोपदारांनी रिंगण लावले आणि अश्व सोडण्यात आले. या वेळी माऊलींच्या नामाच्या जयघोषाने सारा आसमंत दणाणून गेला. अतिउत्साही भाविक मधेच उठल्याने माऊलींचा अश्व बिचकला, आणि भाविकांमध्ये घुसला. तीन ते चार लोकांच्या अंगावर गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुन्हा अश्वांना रिंगणात सोडण्यात आले. अश्वांनी दोन फेऱ्या मारून रिंगण रंगविले. साऱ्यांप्रमाणे मीही या रिंगणाचा आनंद अनुभवला. मात्र, अश्व भाविकात घुसल्याची घटना माझ्या मनातून गेली नव्हती. भाविकांत घुसलेला अश्व तसाच धावत राहिला असता, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, या विचारांनी मी घाबरून गेलो होतो. त्यामुळे जखमी झालेल्या भाविकांना भेटण्याची माझी इच्छा झाली. त्यामध्ये 65 वयाच्या वृद्ध महिलेच्या पायावर अश्वाची टाच लागली होती. मी जाऊन विचारले, आजी जास्त लागले का? तर, ती उत्तरली...नाय माऊलींचा पाय नुसताच घासून गेलाय. लोक टापांखालची माती घेण्यासाठी तडफडतायत...अन् मला त्याचा पाय लागला म्हणून काय झालं..?तिच्या या उत्तराने मी पुरता स्तिमित झालो होतो. तत्क्षणी मला असं जाणवलं की काय ही अंधश्रद्धा..? आणि मी चालू लागलो. एक- दोन किलोमीटरनंतर मला तीच महिला चालताना दिसली. त्या वेळी मला असे जाणवले, की माऊलींचा पाय पडला, तरी त्यात स्वत:ला धन्य समजणे ही माझ्या दृष<br />्टीने अंधश्रद्धा होती. पण, एवढे मोठे संकट येऊनही न डगमगता पुन्हा वारीची वाट धरून चालायचे, ही केवढी श्रद्धा...!<br /><br /><br />एरव्ही किरकोळ जखम झाली, तरी तिचा बाऊ केला जातो. मात्र, इक्षे प्रसंग जीवावर बेतला असतानाही तिचा माऊलींवरचा दृढ विश्वास तसूभरही कमी झाला नाही. हे सर्व बळ श्रद्धेचेच असू शकते. <br />- शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-80747803475264356612008-07-09T20:17:00.002+05:302008-07-09T20:23:24.719+05:30बुधवार, नऊ जुलै, रात्री सव्वा आठ वाजतावासुदेवाशी बोलणं संपत आलं तसा माऊलींचा पालखी सोहळा मांडवे ओढ्यावर विसावला होता. रिंगणाचा सोहळा असल्यानं भाविकांचे डोळे सदाशिवनगरला होते. रिंगण दुपारी दोन वाजता होते. मात्र, सकाळी दहापासूनच भाविकांनी जागा धरून ठेवल्या होत्या. जेवणाचा कार्यक्रम उरकून पालखी दोन वाजता रिंगणाच्या परिसरात आली. चोपदारांनी दिंड्या लावून घेतल्या. माऊलींचा अश्व आणि पालखी दिंड्यातून वाट काढून रिंगणाच्या मधोमध आली. अश्वांना धावण्याच्या रिंगणात नेले. माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पदमजा देवी मोहिते पाटील यांनी पालखीची पुजा केली. अश्वांना हार अर्पण केले. दरम्यानच्या काळात पताकाधारी वारकऱयांनी पालखीच्याकडेने दाटी केली होती. मुख्य सोहळा पाहण्यासाठी वारकरी आसुसले होते. <br /><br />सव्वा दोनच्या सुमारास चोपदाऱांच्या इशाऱयानंतर भोपळे दिंडीतील मानकऱयाने रिंगणाला तीन फेऱया मांडल्या. त्यानंतर उद्धव चोपदार याने माऊलींच्या अश्वाला रिंगण दाखविले. त्यापाठोपाठ स्वाराच्या अश्वानं एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाला रिंगणात सोडण्यात आले. दोन्ही स्वारांनी काहीक्षणात रिंगणाला तीन फेऱया घातल्या. यावेळी माऊली नामाच्या गजरानं आसमंत दणाणून गेला होता. रिंगण संपताच टापांखालील माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱयांची झुंबड उडाली. <br /><br />दरम्यानच्या काळात अश्वांनी रंगवलेल्या रिंगणाचा आनंद दिंड्या-दिंड्यांमधून दिसत होता. पारंपरीक खेळ रंगले होते. वास्करांच्या दिंडीत नेहमीप्रमाणे राजकाऱयांचा गलका होता. विवेकानंद वास्कर, प्रतापसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते यांनी फुगडी खेळली. त्यानंतर साऱयांच्याच आग्रहानं प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पदमजादेवी मोहिते पाटील यांनीही फुगडी खेळली. बबनराव पाचपुते आणि त्यांच्या सौ. पाचपुते यांचीही फुगडी रंगली. सारं राजकारण बाजुला ठेवून रंगलेला हा खेळ या नेत्यांनी अगदी मनापासून खेळला हे खरं...!<br /><br />हा आनंद घेऊनच सोहळा पुढे मार्गस्थ झाला. रात्री सात वाजता सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचला.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-90680415621329857732008-07-09T19:13:00.003+05:302008-07-09T19:18:54.945+05:30बुधवार, नऊ जुलै, संध्याकाळी सात वाजतामाऊलींचा सोहळा सकाळी साडेसहाला नातेपुतेहून मार्गस्थ झाला. आम्ही मात्र उशिरा उठल्यानं साडे आठला रस्त्याला लागलो. माऊलींचा रथ गाठण्यासाठी आम्ही गाडीतून जायचं ठरवलं. जाताना दिंड्यांमध्ये वासुदेव नाचताना दिसला. त्याच्याशी बोलायचं ठरवलं, पण रथ गाठण्यासाठी गाडी सोडता येत नव्हती. त्यामुळं त्याला आम्ही गाडीतच घेतलं. त्याच्याशी झालेलं बोलणं त्याच्याच शब्दात इथं देतोयः<br /><br />मी मुळचा अकोल्याचा. पंधरा दिवसांची वाटचाल करून आळंदीला आलो. तिथून वारीसोबत चालतोय, या वासुदेवानं सांगितलं...<br /><br /><em>अकोल्यातल्या कॉलेजात शिपाई म्हणून कामाला होतो. पर्मनंट करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्यामुळं मी बाहेर पडलो. त्यानंतर गुलाबराव महाराजांकडे गेलो. तेथे त्यांनी वासुदेवाचं शिक्षण दिलं. त्यावरच सध्या उदरनिर्वाह चालतोय. वर्षातून दहा महिने घराबाहेर असतो. या काळात बाहेर फिरून होईल तेवढे पैसे घरी मनी ऑर्डरनं पाठवतोय. <br /><br />वारी बावीस वर्षांपासून करतोय. वारीसारखं सुख नाही. या सोहळ्यात हरिनामाचा गजर करायला तर मिळतोच आणि आर्थिक उत्पन्नही दोन-अडिच हजाराच्या घरात जातं. <br /><br />मंदिर, पोलीस ठाण्याच्याबाहेर झोपतो...वासुदेवाचं मुख्य काम प्रबोधन करणं हे आहे. त्याप्रमाणं मी नाशिक परिसरात अधिकाधिक काळ हे काम करतो. ज्या घराबाहेर तुळशी वृंदावन आहे, तिथंच भिक्षा मागायची हा नेम आहे. अनेकदा बाहेर नागरीकांचा त्रासही होतो. दारुडे, गावातील टारगट मुलं त्रास देतात. त्यामुळं पोलीस ठाण्याचा आश्रय घेऊन रात्री मुक्काम करतो. <br /><br />मंगळवारी रात्रीच नातेपुतेमध्ये असं झालं...मी एका घराबाहेर थांबलो असताना एकानं विचारलं, काय करतो रे. मी सांगितलं, थोडं सावलीत थांबलोय. ऊन जास्त आहे. थोड्या वेळानं जाईन इथून. त्यावर त्या माणसानं काठीच काढली...मी म्हणालो, तु कितीही मार, मी प्रतिकार करणार नाही. हे सारं बोलणं, एक वृद्ध महिला एेकत होती. तिला राहावलं नाही. ती समोर आली आणि तिनं त्या माणसाला दरडावलं. या वृद्धेमध्ये मला माऊलीचं दर्शन झालं...</em><br /><br />या वासुदेवासारखे लाखो वारकरी असं माणसांत देव शोधतात...आणि सोप्या शब्दांत अध्यात्माचा अर्थ सांगतात...sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-23003539436858168412008-07-09T15:54:00.002+05:302008-07-09T16:08:14.987+05:30बुधवार, नऊ जुलै, दुपारी चार वाजतामाऊलींचे पहिले गोल रिंगण बुधवारी दुपारी अलोट वारकऱयांच्या साक्षीनं झालं..माऊलींच्या पालखीच्या अश्वानं तीन फेऱया पूर्ण करून लाखो वारकऱयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले...<br /><br />वारीच्या वाटेवर हा सोहळा अविस्मरणीय असतो. अनेकदा वारी करणाऱायंनाही या सोहळ्याची ओढ असते. <br /><br />बुधवारी दुपारीही ही ओढ प्रत्येक वारकऱयांमध्ये जाणवत होती.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-39998434681272529922008-07-08T18:05:00.001+05:302008-07-08T18:07:45.996+05:30मंगळवार, आठ जुलै - सायंकाळी सहा वाजतान्याहरीची रंगत....<br /><br />सकाळी बरडहून पालखी सोहळा निघाला. हा परिसर तसा दुष्काळीच. काटेरी बाभळी, झाडेझुडपांचा इथे सुकाळ. लोकसंख्या अडीच तीन हजार. वारकऱ्यांचा महासागर लोटल्यानंतर गावाचा चेहरामोहराच बदलून गेला होता. सारं गाव भक्तीसागरात डुंबत होतं. आणि भल्या पहाटेच या सागराला ओहोटी लागली आणि एकएक प्रवाह दिंडी रुपात पुढं सरकू लागला. सकाळच्या टप्प्यात वातावरणात गारवा होता. नऊनंतर मात्र, उन्हाचा चांगलाच चटका लागत होता. वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास वारकऱ्यांना होत होता. मात्र, गारवा मनाला उभारी देत होता. नऊच्या सुमारास माऊली साधुबुवांच्या ओढ्याजवळी मंदिरात थांबली. आणि चालणारे वारकरी उजाड रानमाळावर विखुरले. येथे संपतमहाराज कुंभारगावकर यांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना बाजरीची भाकरी अन् तिखट आमटी दरवर्षी दिली जाते. या आमटीची चव काही न्यारीच असते. बाजरीच्या भाकरीचा हाताने भुगा करून पितळी (ताटात) ओतलेली आमटी कालवून फुरका मारीत रंगणारा हा रानभोजणाचा आगळावेगळा अनुभव याठिकाणी येतो. काटेरी झुडपांच्या आडोशाला आधार घेऊन दिंड्या न्याहारीच्या कार्यक्रमाला विसावल्या होत्या. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आल्हाददायक वातावरणातील वाटचाल सुखकारक वाटत होती. भगव्या भक्तीचं हे वारकऱ्याचं गाव नाचत गात पुढं सरकतं होतं. पताका वाऱ्यावर फडफडत होत्या. टाळमृदगाच्या निनादानं अवघा आसमंत दणाणून गेला होता. दक्षिणेला शिंगणापुराच्या महादेवाचा डोंगर दिसत होता.<br /><br />चिंकाराची चर्चा....<br />करीत निघालेल्या या सोहळ्यात वनमंत्री बबनराव पाचपुते सपत्निक चालत होते. आजूबाजूला वनकर्मचाऱ्यांची मांदियाळी होती. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वन अधिकारी पाचपुतेंना सामोरे आले. एक हार माऊलींसाठी तर दुसरा हार मंत्र्यासाठी तयार होता. धर्मपुरीजवळ सोलापूर हद्दीत पालकी सोहळा प्रवेश करणार होता. परंतु त्याअगोदर वनमंत्र्याचं जंगी स्वागत केलं. आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सायबाचं कौतुक करायला मिळाल्याचं समाधान कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळलं होत. एवढ्यात सोहळ्याबरोबर चालणाऱ्या पत्रकारांचा जथ्था आल्याचं दिसतात. वनमंत्री थबकले. वारीचा विषय सुरू असतानाच प्रश्नांची सरबती करून हा विषय चिंकारा प्रकरणाकडे वळला. आणि वनमंत्र्यांनी सावध पवित्रा घेत. "मी वारीत चालतो, इथं तरी राजकारणाचा विषय नको. परंतु अत्राम यांनी दिलेल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचा ताज्या विषयावर भाष्य करणे त्यांना भाग पडलं. मी क्लिनचिट दिल्याचा अर्धवट माहितीवर वर्तमानपत्रांनी चुकीचा अर्थ लावल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अत्राम यांच्यासंदर्भात चौकशी सुरू असून, परिस्थितीजन्य पुरावा त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तो आल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार वन्यजीव कायद्यानुसार योग्य ते कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार तसेच अजित पवार यांनी याप्रकरणी "योग्य ते निर्णय घ्या' असाच सल्ला दिला. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर पत्रकारांच्यात मात्र, गाजत असलेल्या प्रकरणाबाबत बातमी मिळाल्याचं समाधान झालं होतं. पालखी आळंदीतून निघण्यापूर्वीच उघड झालेल्या या चिंकारा प्रकरणाबाबत वारीत चर्चा रंगत होती. <br /><br />पालखी नातेपुतेत....<br />धर्मपुरीच्या माळावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सोहळ्याचे अकरा तोफांची सलामी देऊन स्वागत झालं. पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. हरिनामाचा गजर करीत सोहळा रणरणत्या उन्हात वाटचाल करीत सोहळा नातेपुतेत विसावला. <br /><br />- शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-68791995874407411162008-07-08T10:41:00.003+05:302008-07-08T11:36:12.063+05:30मंगळवार, आठ जुलै, सकाळी साडे अकरा वाजतातोफांच्या सलामीनं सोलापूरकरांनी माऊलींच्या पालखीचं स्वागत केलंय. इथं ही प्रथा आहे. पालखीच्या वाटेवर वेगवेगळ्या गावांत, वेगवेगळ्या जिल्ह्यात स्वागताच्या खूप भावणाऱया प्रथा आहेत. महाराष्ट्रात मराठी बोलीभाषा गावाबरोबर बदलते. प्रथाही तशाच गावाबरोबर बदलतात. पण, प्रत्येक प्रथांमध्ये दिसतो तो वारीविषयीचा अत्यंतिक जिव्हाळा आणि भक्ती. गावची जत्रा भरल्यासारखं वातावरण अख्ख्या गावांत दिसतं. वारी चालते त्या प्रत्येक मार्गावर ही अध्यात्माची आणि व्यवहाराची गंगा वाहताना दिसते.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-12633997555493679842008-07-08T10:29:00.001+05:302008-07-08T10:41:27.634+05:30मंगळवार, आठ जुलै, सकाळी साडे दहा वाजतामंगळवारी सकाळी साडे सहाला माऊलींची पालखी निघाली. बरडच्या मुक्कामाहून आता वेध आहेत, ते सोलापूरचे. सकाळच्या विसाव्याला साधुबुवाचा ओढा येथे थांबली आहे. आता काहीवेळातच धर्मापुरीजवळ सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेश करेल...sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-83335636942756220992008-07-08T10:23:00.000+05:302008-07-08T10:26:22.668+05:30मंगळवार, आठ जुलै, सकाळी सव्वा दहा वाजतापंढरीच्या वारीवर माहितीपट काढण्याच्या हेतूने लंडन येथील इनेसा वायचुट आणि बॅरिग्टन डी. ला. रोच हे परदेशी वारकरी दिंडी क्रमांक चारमध्ये चालताहेत. त्यांच्या मनातील रिंगणाविषयी भावना मला जाणून घ्यायची होती. त्यासाठी सोमवारी रिंगणामध्ये मी शेडगे पंच मंडळी दिंडी क्रमांक चारजवळ आलो. ते दोघे दिंडीत होते. त्यांतील बॅरिग्टनने पांढरा कुरता सलवार डोक्यात टोपी घातली होती. त्यामुळे तो ओळखू येत नव्हता. इनेसाने आकाशी रंगाचा कुरता सलवार घातला होता. दोघांच्याही हातात कॅमेरे होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या ठेक्यात वारकऱ्यांबरोबर दोघांनीही ताल धरला होता. नाचताना दंग झालेल्या या परदेशी वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. नाचता नाचता ते दोघे देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांचेही शुटींग करीत होते. भक्तीचा हा सोहळा कॅमेऱ्यात साठविताना "ज्ञानोबा- माऊली'च्या ठेक्यात अक्षरशः नाचत होते. रिंगणाच्या या सोहळ्यात त्यांना कशाचं शुटींग करायचं आणि कशाचं नाही, असं झालं होतं. कारण त्यांना साराच भक्तीभाव कॅमेऱ्यात साठवायचा होता...<br /><br /><strong>- शंकर टेमघरे</strong>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-38534322030473838722008-07-07T18:50:00.001+05:302008-07-07T18:52:19.194+05:30सोमवार, सात जुलै, संध्याकाळी पावणे सात वाजतामाऊली नामात विदेशीही दंग !<br /><br />पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी उभा महाराष्ट्र वारीची वाट चालतोय. कोणतेही निमंत्रण नसताना विठुचरणी लीन होण्यासाठी ही मांदियाळी या वाटेवर एकवटलीय. या सोहळ्याचा महिमा आता सातासमुद्रापार गेलाय. यंदाच्या पालखी सोहळ्यात इंग्लडमधील इनेसा वाईचुयी आणि बॅरिंग्टन डी ला रोची हे दिंडी क्रमांक चारमध्ये वारीत चालताहेत. इनेसा कलाकार असून बॅरिंग्टन संपादन तसेच दिगदर्शनाचे काम करीत आहेत. त्यांच्याशी बोलायचं ठरवलं, शनिवारी त्यांना गाठलं. तुम्हाला पंढरीच्या वारीबाबत माहिती कशी मिळाली, त्यावर बॅरिंग्टन म्हणाला, ""लंडनमध्ये आम्ही राहतो, तेथील वसंतराव चाफेकर हे आमचे मित्र. आम्ही त्यांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासंदर्भांत बोललो, त्यावेळी त्यांनी आम्हाला पंढरपूर वारीचा संदर्भ दिला. त्यानंतर आम्ही भारतात येऊन आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यावेळी वारीबाबतची सर्व माहिती घेतली. आणि त्यावर माहितीपट करण्याचा निर्णय घेतला. यंदा वारीत चालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षभर अगोदर आम्ही इंग्लडमध्ये चालण्याचा सराव केला. यंदा आळंदीपासून वारीत सहभागी झालोय. वारीत चालताना भाषेची अडचण येवू नये, म्हणून सांगलीतील दुभाषी नेमलाय. याच्या माध्यमातून मुलाखती तसेच भौगोलिक माहिती तो आम्हाला चित्रीकरणापूर्वी पुरवितो.<br /><br />वारीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, एवढा रोमांचक अनुभव आजपर्यंत पाहावयास मिळाला नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ भगवंताच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने लोक मैलो न् मैल पायपीट करताना दिसताहेत. निसर्गाची चिंता न करता लोक सहभागी होत आहेत. असा अनुभव आम्हाला जीवनात प्रथमच पाहावयास मिळाला. दोन लाख लोक एकाच वेळी चालतात, त्यांना थकवा जाणवत नाही, ही प्रेरणा येते तरी कुठून? वारकऱ्यांच्या या नित्याच्या सवयीचाही आम्ही अभ्यास करीत आहोत.<br /><br />वारीत काय अडचण जाणवते, असे विचारले असता, तो म्हणाला, कॅमेऱ्याची बॅग पाठीवर घेऊन चालताना काहीसा त्रास होतोय. आणि धुळीमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवतोय.<br /><br />तुम्ही वारीतून काय शिकलात? या प्रश्नावर बॅरिग्टन तातडीने उत्तरला, ऍडजेस्टमेंट. इंग्लडमध्ये माझं घर "एसी' आहे. अशा वातावरणात राहत असताना आम्ही वारीत सर्व काही "ओपन' वावरतोय. आणि हो, वारी आणखी एक शिकलो, "ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली'.'' <br /><br />वारीबाबत काय सुधारणा व्हावी, असे आपण्यास वाटतं असं विचारलं असता, तो हात जोडून म्हणाला, ""एवढ्या मोठ्या सोहळ्याबाबत सुधारणा सूचविण्याएवढा मी मोठा नाही. आमच्याकडं पाच- दहा जणांना ग्रुपने नियोजन केल्याशिवाय वावरता येत नाही. त्याउलट कोणत्याही प्रकारची शासकीय यंत्रणा नसताना लाखो भाविक एकत्र वीस दिवस एकत्र चालतात, राहतात. हा आमच्या दृष्टिने एक चमत्कारच आहे.<br /><br />वारीविषयी त्यांना विचारले असता,"दोन लाख लोक एकाचवेळी चालतात याची प्ररणा कोठून येते, त्यांना थकवा जाणवत नाही, वारकऱ्यांच्या या नित्याच्या सवयीचा हे दोघे सध्या अभ्यास करीत आहेत.'<br /><br />पंढरीची वारी हा एक अविष्कार आहे, हे केवळ आपल्यालाच वाटते, हा माझा समज दूर झालाय. जो या वाटेने चालतो, त्याला तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित...<br /><br /><span style="font-weight:bold;">- शंकर टेमघरे<span style="font-style:italic;"></span></span>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-84534221208991312052008-07-06T16:00:00.000+05:302008-07-06T16:01:00.783+05:30रविवार, ६ जुलै - आनंदसोहळ्यात पहिले रिंगण.....आळंदी ते पंढरपूर या वारीच्या वाटेवर रिंगणातील आनंद काही औरच. रिंगणाला कोणी पूजा म्हणतात, तर कोणी खेळ. वारकऱ्यांच्या दृष्टिने तो असतो, केवळ एक आनंदसोहळा. सोहळ्यात दोन अश्व असतात. एक स्वाराचा आणि एक माऊलींचा. स्वाराच्या अश्वावर जरीपटक्याचा ध्वज घेतलेला श्रीमंत शितोळे सरकारांचा स्वार असतो. तर माऊलींच्या अश्वावर गादी असते. त्यावर माऊली विराजमान असते, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे या मार्गावर जेवढी गर्दी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाला होते, तेवढीच गर्दी या अश्वांच्या दर्शनाला. रिंगणात अश्वांवरील माऊलीला अनुभविण्यासाठी एकच गर्दी झालेली असते. वारीच्या वाटेवर दोन उभी आणि चार गोल रिंगणे होतात.<br /><br />पहिले उभे रिंगण लोणंदजवळील चांदोबाच्या लिंबाजवळ असते. मंदिराजवळ माऊलींचा रथ थांबतो. अग्रभागी दोन्ही अश्व त्यानंतर रथापुढे २७ आणि त्यानंतर रथ आणि रथामागे २५० दिंड्या अशी सोहळ्यातील रचना असते. सोहळ्याचे नियंत्रण म्हणून असणारे परंपरागत चोपदार रिंगण लावतात. रिंगण लावतात, म्हणजे दिंड्यांमध्ये अश्वाला धावण्यासाठी पुरेशी जागा करुन घेतात. ही सारी प्रक्रिया अवघ्या पाच एक मिनिटात होते. त्यानंतर सुरू होतो, मुख्य सोहळा. यावेळी वारकऱ्यांमध्ये टाळ- मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा- माऊली' असे भजन सुरू असते. त्यावर वारकरी नाचत असतात. या दमदार ठेक्यात रिं गण पाहण्यासाठी आलेले भाविकही दंग होतात. रिंगणात माऊली आपल्याबरोबर खेळते, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे एवढ्या गर्दीतही रिंगण लावण्याच्या प्रक्रियेस वेळ लागत नाही. दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या मागे रिंगण पाहण्यासाठी आलेल्या परिसरातील भाविकांची गर्दी उसळलेली असते. सर्वांनाच आस असते, ती माऊलींच्या अश्वाच्या धावण्याची. काही मिनिटांत चोपदार माऊलींच्या अश्वाला रिंगण दाखवितात. सोबत स्वाराचा अश्व असतोच. अग्रभागी असणारे दोन्ही अश्व बेफाम दौंडत रथाजवळ येऊन रथामागील वीस दिंड्यांपर्यंत जातात. व पुन्हा माघारी फिरून रथाजवळ येतात. त्यांची रथाजवळ पूजा करुन त्यांना प्रसाद दिला जातो. व त्यांना पुन्हा रथापुढील २७ दिंड्यांमध्ये अश्वांना सोडण्यात येते. भरधाव वेगात दोन्ही अश्व एकमेंकांशी स्पर्धा करीत अग्रभागी जातात. कधी स्वाराचा तर कधी माऊलींचा अश्व पुढे- मागे धावतात. हाच क्षण भाविकांना अनुभवायचा असतो. त्यानंतर माऊलीच्या अश्वाच्या पायाखालची धूळ (माती) कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. त्यानंतर चोपदार रथावर चढून चांदीचा चोप उंचावतात. चोप उंचावला रे उंचावला की, जोपर्यंत वारकऱ्या<br />ंना तो दिसतो, तिथपर्यंत वारकऱ्यांमधील टाळमृदंगांचा गजर आणि भजन थांबते. साऱ्या परिसरात पसरते ती केवळ शांतता. त्यानंतर आरती होऊन चोप गोल फिरवून चोपदार उडी मारतो, यालाच उडीचा कार्यक्रम म्हणतात. उडीनंतर रिंगण सोहळा संपतो. अन्त्या सोहळा चालू लागतो. रंगलेल्या रिंगणानंतर दिंड्यांमध्ये फुगड्या, खो-खो, हुतूतू, कोंबडा, वारकरी पावक्या असे विविध खेळ रंगतात. वारकरी वय विसरून नाचतात. आयुष्यात कधी न नाचलेला वयोवृद्धही वारीच्या वाटेवर "माऊली'नामात दंग होतो, अ्न देहभान विसरून नाचतो. होय, यालाच तर म्हणतात.... आनंदसोहळा.<br /><br />शनिवारी सारं काही असंच झालं. तोच सोहळा, तेच वारकरी, तिच माऊली अन् तोच उत्साह. रणरणत्या उन्हात माऊलीचा रथ चांदोबाच्या लिंबाजवळ आला. दुपारी सव्वाचारला रिंगण सुरू झालं. बाळासाहेब चोपदार, राजभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर यांनी रिंगण लावून घेतलं. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा- माऊलींच्या जयघोषाने अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं. बेफाम वेगात दोन्ही अश्व रिंगणात धावले. माऊली- माऊली असा जयघोष झाला. अन् माऊलींच्या अश्वाने घेतलेली बेफाम दौड लाखो भाविकांनी डोळ्यात साठवली. अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर बाळासाहेब चोपदार यांनी रथावर चढून मानाचा चोप उं चावला. अन् परिसरात शांतता पसरली. त्यानंतर आरती झाली. आणि दिड्यांमध्ये खेळ रंगले. सारं काही वातावरण दरवर्षीप्र माणे होतं. माऊलींच्या अश्व रिंगणात बेफाम धावल्याने वारकऱ्यांत चैतन्य संचारले होते. माऊली आमच्यात खेळली, हीच भावना उराशी बाळगून सोहळा तरडगावात मुक्कामी विसावला. <br /><br />यावेळी किसनमहाराज साखरे भेटले. त्यांच्याशी रिंगणाबाबत विषय काढला. त्यावेळी ते म्हणाले,"" रिंगण म्हणजे प्रदक्षिणा. देवाच्या उपचारामध्ये सोळा उपचार आहेत. त्याला षोड्पचार असे म्हणतात. या उपचारामध्ये पंचामृत स्नान, धूप, दीप, नै वेद्य, अभिषकासाठी पुरुषसुक्त आणि रुद्र असे अभिषेक आहेत. एक अभिषेकापूर्वीची पूजा व दुसरी अभिषेकानंतरची पूजा. या पूजांना उत्तरपूजा व पूर्वपूजा म्हटली जाते. या उपचारामध्ये देवाला प्रदक्षिणा घालणे हा एक उपचार आहे. जेथे मंदिर नसते. अशा ठिकाणी पूजा करणारा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो. म्हणजेच प्रदक्षिणा हा वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचा उपचार आहे. हे प्रदक्षिणा तत्त्व लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांना मध्यभागी घेऊन माऊलींभोवती जेव्हा एखाद्या स्थानावर प्रदक्षिणा करतात. ती गोल प्रदक्षिणा हो आणि माऊलीला मध्यस्थी ठेवून घालण्यात येणाऱ्या प्रदक्षिणेला उभे रिंगण म्हणतात. रिंगण म्हणजे प्रदक्षिणा, परिक्रमा होय. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्याने वारकऱ्यामध्ये भक्ती, प्रीती व चै तन्य निर्माण होते आणि तो उत्साहाने वाटचाल करते.''<br />- शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-22894402982127687522008-07-05T16:52:00.002+05:302008-07-05T17:00:59.391+05:30शनिवार, पाच जुलै, दुपारी साडे चार वाजतासत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण शनिवारी दुपारी चार वाजता चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार पडले. लाखो भाविकांनी या रिंगणाचा आंनद अनुभवला. तत्पुर्वी दुपारी एक वाजता वारकऱ्यांनी लोणंदकरांचा निरोप घेतला. ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.<br /><br />पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचे लिंब येथे असल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसत होता.<br /><br />ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.<br /><br />वाहतुकीत अडथळा येऊ नये, म्हणून पोलिसांनी सकाळीच यामार्गावरील वाहतूक पुढे काढून दिली. रिंगणानंतर पालखी तरडगावला मुक्कामासाठी रवाना झाली आहे.<br />- शंकर टेमघरेsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-25963501490398428442008-07-04T16:17:00.002+05:302008-07-04T16:25:26.490+05:30शुक्रवार, चार जुलै, दुपारी सव्वा चार वाजतामाउलींचा पालखी सोहळा अडिच दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी लोणंदमध्ये विसावला...लोणंदकरांनी दरवर्षीच्याच जल्लोषात पालखीचे स्वागत केले.<br /><br />लोणंद ही राज्यातील कांद्याची बाजारपेठ. पूर्वी इथले व्यापारी एकत्र निधी जमवून वारकऱयांना जेवण देत असत. खिरीचा नैवेद्य हे इथले वैशिष्ट्य होते. ही मंडळी वाजतगाजत माऊलींच्या पादुकांकडे नैवेद्य नेत असत. त्यानंतर दिवसभर पंगती पडत.<br /><br />सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण भागातले वारकरी लोणंदपासूनच वारीत सहभागी होतात. दर्शनासाठीही या भागातून गर्दी होते.<br /><br />लोणंदचे ग्रामदैवत भैरोबानाथ. पण, माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा गावचा यात्रेचा दिवस. वार्षिक यात्रा याच दिवशी होते. सासुरवाशीणीही याच काळात दोन दिवसांसासाठी लोणंदला येतात. अमावस्येपूर्वी तिथी वाढली, तर इथे अडिच दिवस मुक्काम असतो. नसेल, तर दीड दिवस असतो.<br /><br />लोणंदचा जवळपास पाच किलोमीटरचा परिसर भाविकांच्या राहुट्यांनी भरतो. यंदा भाविकांची दर्शनबारी तब्बल दीड किलोमीटर लांब पसरली आहे. दिंड्यांमध्ये काही वाद असतील, तर बैठकही लोणंदमध्येच होते, शितोळे सरकारांच्या पालावर. आपण, या बैठकीचीही माहिती करून घेऊ. थोड्याच वेळात.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-31606753664136448622008-07-03T20:02:00.002+05:302008-07-03T20:31:23.942+05:30गुरुवार, तीन जुलै, रात्री सव्वा आठ वाजताबुधवारी पालखीचा मुक्काम वाल्ह्यात होता. पालखी तळावर सोडून आम्ही सर्व पत्रकार बातम्या पाठविण्यासाठी जेजूरीला आलो. बातम्या पाठविल्यानंतर मुक्कामेला निरेला जायचे, असा निर्णय झाला. निरेला विश्रामगृहावर जेवत असताना, आमच्या एका वरिष्ठ बातमीदाराला तहसीलदारांचा मोबाईल आला.<br />मुख्यमंत्र्यांच्या मिसेस उद्या वाल्ह्यात पहाटपुजेला येणार असून त्या वारीतही चालणार आहेत.<br /><br />एका नव्या पत्रकाराने ऑफिसला फोन करून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वारीत चालणार, अशी बातमीही सांगितली. त्या वर्तमानपत्रात बातमी येणार म्हटल्यावर सर्वांनीच जोड म्हणून सर्वच पत्रकारांनी ही दिली. आम्ही सोहळ्याच्या पुढे आल्याने पहाटे वार्तांकनाला कसे जायचे, याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका अनुभवी बातमीदाराने असा पर्याय काढला की, आपल्यातील छायाचित्रकार आणि चॅनेलचे कॅमेरामननी वाल्हात मुक्कामाला जावे. कारण सकाळी निरेतून वाल्ह्याला जाणे होणार नव्हते. आता प्रश्न होता वाल्ह्याच्या मुक्कामाचा. कारण वाल्ह्यामध्ये विश्रामगृह नव्हते. त्यामुळे तंबुत झोपावे लागणार होते. आम्ही सोहळा प्रमुखांना फोन करून चार सहकाऱयांसाठी जागा ठेवण्याचा निरोप दिला. चौघेजण गेले. जेजूरी ते वाल्हे हा आठ-नऊ किलोमीटरचा टप्पा चालल्याने सर्वजण थकलेले होते.<br /><br />मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वारीत चालण्याचा फोटो मिळविण्यासाठी छायाचित्रकरांना जाण्याशिवायही पर्याय नव्हता. विशेष म्हणजे, जाणारे चौघेही नवीन होते. त्यांना तंबूत राहण्यासंबंधी माहिती नव्हती. जवळ कॅमेरेसारख्या मौल्यवान वस्तू होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास मंडळी वाल्ह्याला रवाना झाली. सकाळी साडे सहाच्या दरम्यान एका छायाचित्रकाराचा फोन आला, की मॅडम येण्याचे रद्द झाले आहे.<br />त्यानंतर मी सोहळाप्रमुखांना फोन केला. त्यांनी मला असे सांगितेले की, पोलिसांचा आत्ताच फोन आलाय सौ. देशमुख जेजूरी पास झाल्या आहेत. आम्ही तातडीने छायाचित्रकार आणि अन्य सहकाऱ्यांना रथाजवळ थांबायला सांगितले. त्यानंतर तासाभराच्या अंतराने आम्हाला पोलिसांचा फोन आला की व्हीआयपी ताफ्यातन सौ. देशमुख आल्यात. पण त्या विलासराव देशमुखांच्या पत्नी नाहीत.<br />त्यानंतर आम्ही पुन्हा फोन केलेत आणि माहिती काढली. कारण गाडीतून उतरेपर्यंत पोलिस, महसूल विभाग, देवस्थान या सर्वांना विलासराव देशमुखांच्या पत्नी येणार अशी सुचना होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी येणार म्हणून पंधरा मिनिटे सोहळा थांबूनही ठेवला होता.<br /><br />सकाळी सव्वा सातच्या दरम्यान ताफा आला. पोलिसांनी खातरजमा केली, तेव्हा त्या विलासराव देशमुख यांच्या पत्नी नसून मुख्यमंत्र्यांचे बंधू आमदार दिलीप देशमुख यांच्या पत्नी सौ. सुवर्णादेवी देशमुख असल्याचं समजलं.<br /><br />तिथे पोहचलेल्या नव्या छायाचित्रकारांना विलासराव देशमुखांच्या पत्नी माहित नसल्याने त्यांनी शुटींग, फोटो, घेतले. चॅनेलच्या पत्रकाराने तर त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी नकार दिला. या साऱया गोंधळाने वारकरी, महसूल प्रशासन, पोलिस यंत्रणा, देवस्थान आणि पत्रकार या साऱ्यांचेच हाल झाले.<br /><br />वारकऱ्यांमधून या ताफ्याला वाट काढताना पोलिसांची दमछाक झाली. महसूल खाते रात्रभर जागे होते. रात्री एक वाजता तंबूत झोपलेल्या पत्रकारांना पहाटे साडेतीनला उठावे लागले होते.<br /><br />मोहिमेवर पाठविलेले चौघेजण आम्हाला निरेत भेटले. प्रचंड त्रासलेल्या अवस्थेत त्यांनी तिथल्या घडामोडींचे फोटो दाखवले !<br /><br />प्रश्न असा आहे, की एका आमदाराच्या पत्नीसाठी एवढा फौजफाटा कशासाठी ? लाखो वारकरी पायी चालत विठूरायाच्या दर्शनाला जातात. बुधवारी समाजआरतीच्या वेळेत मिनिटभराचाही उशीर झालेला नव्हता. मग, गुरुवारी वारकऱयांना तिष्ठत ठेवणे किती योग्य होते ?<br /><br />वारीत गेल्या तीन-चार वर्षांपासून पत्रकारांना रेस्ट हाऊस, इंटरनेट, फॅक्स या सुविधा सहज उपलब्ध होऊ लागल्यानं अशा पद्धतीची धावपळ खूप कमी झाली आहे.<br /><br />बऱयाच काळानं अशी धावपळ झाली सगळ्यांची !<br /><br />संतानाना चोपदार यांच्याशी हा विषय निघाला, तेव्हा ते म्हणाले, वारीत चालणारा प्रत्येक जण वारकरी असतो. माऊलींपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. यासाठी सोहळ्याला वेठीस धरणं योग्य नाही. या मंडळींच्या वारीत चालण्यानं अनेक अडचणी येतात. वारकऱयांना त्रास होतो. याची जाणिव या मंडळींना व्हायला हवी. किंवा फौजफाटा न घेता, इथं यायला हवं.<br /><br />एक माहिती सांगण्यासारखी आहे. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी गेल्या सहा-सात वर्षांपासून वारीत चालतात. दिंडीत सकाळी सहापासून संध्याकाळी सहापर्यंत असतात. कधीही त्यांनी व्हिआयपी असल्याचं मिरवलेलं नाही. पाडेगावच्या दुपारच्या जेवणात, एका सहकाऱयानं त्यांना विचारलं, की तुम्ही का नाही व्हिआयपीची सुविधा घेत?<br /><br />पाचपुतेंच्या पत्नींचं उत्तर होतं, <em>मी माऊलीसाठी चालते...</em><br /><p>संध्याकाळी माऊलींची वारी लोणंद मुक्कामी पोहोचली आहे... </p><strong><em>- शंकर टेमघरे</em></strong>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-3117851623351780702008-07-03T15:14:00.000+05:302008-07-03T15:16:41.605+05:30गुरुवार, तीन जुलै, दुपारी तीन वाजतासाऱया परंपरेनुसारच गुरुवारी दुपारी अडिचच्या सुमारास निरा ग्रामस्थांनी पालखी रथात ठेवली. जुना पूल संपल्यानंतर रथ थांबला. पुल ओलांडल्यानंतर राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात पादुका देण्यात आल्या. निरा नदीवरील दत्त घाटावर त्यांनी माऊली माऊली असा जयघोष करीत, तीन वेळा पादुकांना स्नान घातले. निरेचे दोन्ही काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी उडाली होती. तीनच्या सुमारास पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. ढोल-ताशांचा दणदणाट आणि आतषबाजीत पालखीचं सातारकरांनी स्वागत केले.<br /><br />पालखीचा मुक्काम लोणंदला आहे. संध्याकाळी सहापर्यंत पालखी लोणंदला पोहोचेल. तिथं अडिच दिवसांचा मुक्काम असेल.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-8935968871235011042008-07-03T13:52:00.001+05:302008-07-03T13:53:58.759+05:30गुरुवार, तीन जुलै, दुपारी पावणे दोन वाजतावारीच्या वाटेवर निरा नदीत माऊलींच्या पादूंकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. नदीच्या अलिकडे रथ थांबविण्यात येतो. पालखीतून पादूका आरफळकरांच्या हातात<br />दिल्या जातात. त्यानंतर दत्त घाटावर पादुकांना स्नान घालण्यात येते. हा क्षण टिपण्यासाठी हजारो भाविकांनी दोन्ही तीरांवर गर्दी केलेली असते. ज्ञानोबा-तुकारामांचा<br />जयघोष सुरू असतो. आरफळकरांच्या हस्ते पादुकांना स्नान घालण्यात येते.<br /><br />पालखीनं या काळात आठवडाभराचा प्रवास केलेला असतो. बहुतांश पुणे जिल्ह्यातील भाविक पालखीला इथं निरोप देतात. इथून पुढं सातारा जिल्हा सुरू होणार असतो. माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक दुसऱया तीरावर सज्ज असतात. हैबतबाबा आरफळकर सातारा जिल्ह्यातील. त्यामुळेही सातारा जिल्ह्यात अमाप उत्साह असतो. पाडेगाव तालुक्याच्या हद्दीत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सोहळ्याचं स्वागत करण्यात येतं. महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या पथकांना इथे निरोप दिला जातो आणि सातारा जिल्ह्यातील पथकांचं स्वागत करण्यात येतं.<br /><br />निरोप आणि स्वागताचा हा सोहळा पालखीच्या एकूण वाटेवरचा एक आगळा सोहळा ठरतो. आत्ताही, थोड्या वेळात पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. आणि हा सोहळा आणखी एकदा अनुभवता येईल...sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-43374759269004970902008-07-03T11:36:00.001+05:302008-07-03T11:37:57.561+05:30गुरुवार, तीन जुलै, सकाळी सव्वा अकरा वाजतामाऊलींच्या पालखीनं गुरुवारी सकाळी प्रतिक्षा अनुभवली...! मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी सौ. वैशाली देशमुख पालखी सोहळ्याला येणार, असा निरोप प्रशासनाला होता. वाल्हे मुक्कामी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. महसूल खात्यातून निरोप होता. गृहखातेही दक्ष झाले. पोलीस खात्यातले वरीष्ठ अधिकारी पालखीच्या मुक्कामी हजर झाले.<br /><br />सकाळी सातची पालखीची प्रस्थानाची वेळ सहसा चुकत नाही. सात वाजून गेले, तरी अजून सौ. वैशाली देशमुख नव्हत्या आल्या. अख्ख्या सोहळ्याचे डोळे प्रस्थानाकडे लागले होते. वीसेक मिनिटांनंतर मोटार आली, ती मुख्यमंत्र्यांचे बंधू आमदार दिलीपराव देशमुख यांच्या पत्नींची !<br /><br />नेमका हा निरोपाचा घोटाळा होता की आणखी कशाचा, हे काही समजू शकले नाही. पण, पालखी सोहळा मात्र घोटाळ्यात पडला हे निश्चित !<br /><br />दरम्यान, हा घोटाळा संपल्यावर पालखी मार्गस्थ झाली. लोणंदच्या मुक्कामासाठी निघाली. साडे नऊच्या सुमारास पिंपळे खुर्द इथं विसाव्यासाठी थांबली.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-33660483721158748592008-07-02T19:44:00.000+05:302008-07-02T19:45:32.753+05:30बुधवार, दोन जुलै, रात्री साडे सातआळंदी ते पंढरपूर या दरम्यान माऊलींच्या पालखीची दुपारी आरती होणारं वाल्हे हे एकमेव गाव. समाजआरती म्हणजे काय? ही का केली जाते? याबाबत थोडसं सांगावं वाटतं.<br /><br />पालखी सोहळ्याचे संस्थापक हैबतबाबा आरफळकर (साधारण 1832 चा काळ) हे कडक शिस्तीचे होते. त्यांची शिस्त सोहळ्यात पुरेपूर उतरली. त्यामध्ये निघण्याची वेळ, विसावा, मुक्कामाची ठिकाणे आणि समाजआरती यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. समाजआरतीला वारीत मानाचं स्थान आहे. दिवसभराची वाटचाल संपून मुक्कामाच्या ठिकाणी देवाच्या तंबूसमोर पालखी आणण्यात येते. त्यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमतात. गोलाकार दिंड्या ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत असतात. गर्दीतून वाट काढीत पालखी मध्यभागी येते. दरम्यानच्या काळात भजनाचा सूर टिपेला पोहोचलेला असतो. तेवढ्यात चांदीचा चोप उंचावतो आणि चोपदार हो हो हो अशी आरोळी ठोकतो.<br /><br />चोप उंचावला रे उंचावला की क्षणार्धात टाळ-मृदंगाचा गजर बंद होतो. मात्र, त्यानंतरही टाळ-भजन सुरू राहिल्यास संबंधित दिंडीची काही तक्रार आहे, असे समजले जाते. दिवसभराच्या वाटचालीत अथवा मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित दिंडीला अडचणी आल्या, तर अशा पद्धतीने टाळ वाजवून तक्रार नोंदविण्याची समाजआरतीत प्रथा आहे. अशी पद्धत बहुधा फक्त वारीतच अनुभवाला येते. त्यानंतर संबंधित दिंडीची अडचण समजावून घेण्यासाठी चोपदार त्या दिंडीजवळ जातात. त्यांची अडचण समजावून घेतल्यानंतर त्यांचे टाळ थांबतात. हा सर्व आवाज बंद झाल्यानंतर हरविलेल्या वस्तूंची यादी वाचण्यात येते. सापडलेल्या वस्तुंचीही यादी वाचली जाते. ओळख पटवून देवाच्या तंबूजवळून या वस्तू घेऊन जाव्यात, अशी सूचना केली जाते. त्यामध्ये ओळखपत्रापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंतच्या चीज-वस्तूंचा समावेश असतो. हे सर्व झाल्यानंतर दिवसभराच्या वाटचालीत दिंड्यांमधील वारकऱयांनी पाळावयाचे नियम सांगण्यात येतात. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला जातो. त्यानंतर दुसऱया दिवशीची निघण्याची वेळ जाहीर करण्यात येते. आरती होऊन पालखी तंबूत विसावते.<br /><br />शिस्तीच्या या प्रक्रियेला समाजआरती म्हणतात. दरवर्षी ठरल्याप्रमाणं प्रत्येक मुक्कामाला ही समाजआरती होते. <span style="font-style: italic;">समाजआरती झाल्याशिवाय दिंडीत चालणारा वारकरी खाली बसत नाही. </span><br /><br />बुधवारी वाल्हेत अशीच समाजआरती झाली. केवळ एका नव्या गोष्टीचा समावेश त्यात झाला. तो तेथील तळ नवा होता. वारीच्या सोहळ्याच्या संख्येमुळे देवस्थान आणि मानकऱयांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाबाहेर मोकळ्या जागेत यंदा तळ हलविला आहे. आता तीस एकरावर माऊलींचा तळ सजला आहे.<br /><span style="font-weight: bold; font-style: italic;">- शंकर टेमघरे</span>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-80482841249812320192008-07-02T14:59:00.000+05:302008-07-02T15:02:12.346+05:30बुधवार, दोन जुलै, दुपारी तीनदुपारी अडिच वाजता माऊलींची पालखी वाल्हे मुक्कमी पोहोचली. आठ किलोमीटरची वाटचाल सहज पार पडली. पालखी पोहोचल्यावर समाजआरती झालीय. आता वारकरी विश्रांती घेत आहेत.<br /><br />थोड्यावेळानं आपण बोलू समाजआरतीविषयी.sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-254208069670620876.post-56849734060873145532008-07-02T11:44:00.002+05:302008-07-02T11:49:49.347+05:30बुधवार, दोन जुलै, सकाळी साडे अकरा<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjz6MKBjQFkeYeZkg9hamek4dh41Tc8Za2CQhc8ErDTGwfI_ZhRWGnWatovZnm39Ya2ic5jTHPV0YOh9W4iHqgRQtBKlVaXywIIUCbqGG6kKtE6AE5IQzgPkOb7WJKqlf40Hs8bj3DONsNB/s1600-h/vari_jejuri.jpg"><img style="margin: 0px auto 10px; display: block; text-align: center; cursor: pointer;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjz6MKBjQFkeYeZkg9hamek4dh41Tc8Za2CQhc8ErDTGwfI_ZhRWGnWatovZnm39Ya2ic5jTHPV0YOh9W4iHqgRQtBKlVaXywIIUCbqGG6kKtE6AE5IQzgPkOb7WJKqlf40Hs8bj3DONsNB/s320/vari_jejuri.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5218297416038182466" border="0" /></a><div style="text-align: center;"><span style="font-weight: bold;">घ्यावे भाकरी-भोकरी...दही भाताची शिदोरी...<br /><br /></span></div>होय असाच प्रत्यय आला बुधवारी सकाळी दौंडज खिंडीत. माऊलींची पालखी नेहमीप्रमाणं सकाळी साडे आठच्या दरम्यान खिंडीत आली. वारकरी लगतच्या माळरानावर विसावले. परिसरातील गावकऱयांनी आणलेल्या न्याहारीची शिदोरी सुटली आणि भाजी-भाकरी, पिठलं, चटण्यांचा घमघमाट सुटला.<br /><br />या अभंगाचा प्रत्यय त्याच क्षणी आला.<br /><br />खरं म्हणजे दरवर्षी दौंडज खिंड हिरवीगार दिसते. यावर्षी पाऊस कमी झालाय. खिंडीचा परिसर काहीसा सुनासुना दिसतोय. हिरवी छटा जरूर आहे, पण दरवर्षी इतका, हिरवा गार गालिचा नाहीय. पालखीचा जथ्था चालत असताना शेजारूनच मालगाडी धडधडत गेली. अध्यात्म आणि आधुनिकतेच्या प्रवाहाचा संगम दाखवणारे हे देखणं दृश्य होतं.<br /><br />सकाळच्या विसाव्यापर्यंत पावसाचं चिन्हं नव्हतं. उलट थोडसं उन्हंही होतं. विसावा संपतानाच जोरदार सर आली आणि वारकऱयांना चिंब करून गेली. पालखी दौंडज गावामध्ये साडे अकराच्या दरम्यान पोहोचली.<br /><br />वाल्हे गाव वाल्मिकी ऋषींचं, असं मानतात. वाल्मीकी ऋषी वाल्या कोळी असताना, याच दौंडज खिंडीत वाटसरुंना लुटत असे, असंही मानतात. याच खिंडीनं वाल्याच कोळीचे वाल्मिकी ऋषी झालेले पाहिले. खिंडीतून पावलं पडत असताना, हा पुराण संदर्भही मनाच्या वाटेवर जरूर होता.<br /><span style="font-weight: bold;">- शंकर टेमघरे</span>sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.com0