सोमवारी दुपारी तीननंतर पावसाने उसंत घेतलीय. जेवण केल्यानंतर वारकऱ्यांनीही विसावा घेतला होता. संध्याकाळी पाचनंतर तंबूंमधून हरिपाठ सुरू झाले आहेत. माऊलींचा सासवडमध्ये दोन दिवस मुक्काम. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केलीय. लांबच लांब रांगा लावून भाविक माऊली चरणी लीन होत आहेत. मनात साठवावा, असा हा भक्तीचा उत्सव सर्वत्र दाटून आलाय.
मंगळवारी, एक जुलैला सकाळी साडेसहाला पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होणार आहे. अठरा किलोमीटरची वाटचाल करून ही विठुरायाची ही मांदियाळी रात्री मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीत विसावेल.
- शंकर टेमघरे
Labels: सासवड
0 comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)