तोफांच्या सलामीनं सोलापूरकरांनी माऊलींच्या पालखीचं स्वागत केलंय. इथं ही प्रथा आहे. पालखीच्या वाटेवर वेगवेगळ्या गावांत, वेगवेगळ्या जिल्ह्यात स्वागताच्या खूप भावणाऱया प्रथा आहेत. महाराष्ट्रात मराठी बोलीभाषा गावाबरोबर बदलते. प्रथाही तशाच गावाबरोबर बदलतात. पण, प्रत्येक प्रथांमध्ये दिसतो तो वारीविषयीचा अत्यंतिक जिव्हाळा आणि भक्ती. गावची जत्रा भरल्यासारखं वातावरण अख्ख्या गावांत दिसतं. वारी चालते त्या प्रत्येक मार्गावर ही अध्यात्माची आणि व्यवहाराची गंगा वाहताना दिसते.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India