साऱया परंपरेनुसारच गुरुवारी दुपारी अडिचच्या सुमारास निरा ग्रामस्थांनी पालखी रथात ठेवली. जुना पूल संपल्यानंतर रथ थांबला. पुल ओलांडल्यानंतर राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात पादुका देण्यात आल्या. निरा नदीवरील दत्त घाटावर त्यांनी माऊली माऊली असा जयघोष करीत, तीन वेळा पादुकांना स्नान घातले. निरेचे दोन्ही काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी उडाली होती. तीनच्या सुमारास पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. ढोल-ताशांचा दणदणाट आणि आतषबाजीत पालखीचं सातारकरांनी स्वागत केले.
पालखीचा मुक्काम लोणंदला आहे. संध्याकाळी सहापर्यंत पालखी लोणंदला पोहोचेल. तिथं अडिच दिवसांचा मुक्काम असेल.
Labels: लोणंद
1 comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)
We want photos of vari. which we cant see or take part of it.