माऊलींच्या पालखीनं मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान जेजुरीच्या हद्दीत प्रवेश केला. ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस नव्हता. पालखी दाखल होताच, भक्तांनी भंडाऱयाची उधळण केली. पालखी भंडाऱयानं अक्षरशः भरून गेली होती. जेजुरीच्या हद्दीत येताच वारकऱयांनी मल्हारी मार्तंडाच्या अभंगांचा ताल धरला होता.
बुधवारी, दोन जुलैला मुक्काम आहे वाल्हे इथं. मागच्या वर्षी वाल्हेत गावकऱयांनी गुढ्या उभा करून स्वागत केलं होतं पालखीचं. यावर्षीच्या स्वागताची उत्सुकताही आहे वारकऱयांमध्ये.
वाल्हेचा नेहमीचा तळ यावर्षी बदलला आहे. बुधवारी नव्या तळावर पालखी जाणार आहे. गावापासून एक किलोमीटरवर नवा तळ आहे.
बुधवारचा टप्पा फक्त आठ किलोमीटरचा. माऊलींच्या वारीचा हा सर्वात छोटा टप्पा. त्यामुळं दुपारीच वारी वाल्हेत पोहचेल आणि मग समाजआरती होईल. समाजआरती पाहण्याची ही सगळ्याच चांगली संधी.
Labels: जेजुरी