माउलींचा पालखी सोहळा अडिच दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी लोणंदमध्ये विसावला...लोणंदकरांनी दरवर्षीच्याच जल्लोषात पालखीचे स्वागत केले.

लोणंद ही राज्यातील कांद्याची बाजारपेठ. पूर्वी इथले व्यापारी एकत्र निधी जमवून वारकऱयांना जेवण देत असत. खिरीचा नैवेद्य हे इथले वैशिष्ट्य होते. ही मंडळी वाजतगाजत माऊलींच्या पादुकांकडे नैवेद्य नेत असत. त्यानंतर दिवसभर पंगती पडत.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण भागातले वारकरी लोणंदपासूनच वारीत सहभागी होतात. दर्शनासाठीही या भागातून गर्दी होते.

लोणंदचे ग्रामदैवत भैरोबानाथ. पण, माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा गावचा यात्रेचा दिवस. वार्षिक यात्रा याच दिवशी होते. सासुरवाशीणीही याच काळात दोन दिवसांसासाठी लोणंदला येतात. अमावस्येपूर्वी तिथी वाढली, तर इथे अडिच दिवस मुक्काम असतो. नसेल, तर दीड दिवस असतो.

लोणंदचा जवळपास पाच किलोमीटरचा परिसर भाविकांच्या राहुट्यांनी भरतो. यंदा भाविकांची दर्शनबारी तब्बल दीड किलोमीटर लांब पसरली आहे. दिंड्यांमध्ये काही वाद असतील, तर बैठकही लोणंदमध्येच होते, शितोळे सरकारांच्या पालावर. आपण, या बैठकीचीही माहिती करून घेऊ. थोड्याच वेळात.

1 comments:

  1. pranitmfeo said...

    Me Nitin Shetye london hun....esakal la dhyanywad...tumche wari pandhari and vithal blog apratim aahet...Sarva newspapaer peksha tumhi atishai changalya ritine update ani chitra sankalan kele aahet yat vad nahi. Pan Journalist chi mehnat hi disun yet aahe..Atishai sunder ..manmohak ani vastav rup wariche tumhi lokani prastut kele aahe...farach chan....esakal chya purna team la hardik dhanywad.

    Nitin Shetye
    nitinshetye@hotmail.com  


 

Sakaal Media Group, Pune, India