माऊलींच्या पालखीनं गुरुवारी सकाळी प्रतिक्षा अनुभवली...! मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी सौ. वैशाली देशमुख पालखी सोहळ्याला येणार, असा निरोप प्रशासनाला होता. वाल्हे मुक्कामी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. महसूल खात्यातून निरोप होता. गृहखातेही दक्ष झाले. पोलीस खात्यातले वरीष्ठ अधिकारी पालखीच्या मुक्कामी हजर झाले.

सकाळी सातची पालखीची प्रस्थानाची वेळ सहसा चुकत नाही. सात वाजून गेले, तरी अजून सौ. वैशाली देशमुख नव्हत्या आल्या. अख्ख्या सोहळ्याचे डोळे प्रस्थानाकडे लागले होते. वीसेक मिनिटांनंतर मोटार आली, ती मुख्यमंत्र्यांचे बंधू आमदार दिलीपराव देशमुख यांच्या पत्नींची !

नेमका हा निरोपाचा घोटाळा होता की आणखी कशाचा, हे काही समजू शकले नाही. पण, पालखी सोहळा मात्र घोटाळ्यात पडला हे निश्चित !

दरम्यान, हा घोटाळा संपल्यावर पालखी मार्गस्थ झाली. लोणंदच्या मुक्कामासाठी निघाली. साडे नऊच्या सुमारास पिंपळे खुर्द इथं विसाव्यासाठी थांबली.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India