मंगळवारी भल्या पहाटेच सोहळ्याला जाग आली. दोन दिवसांच्या विसाव्यानंतर मोठ्या उत्साहात सकाळी सोहळा चालू लागला. सासवडकरांचा निरोप घेऊन वारकरी मंडळी जेजुरीकडे मार्गस्थ झाली आहेत. अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू आहे. अठरा किलोमीटरची वाटचाल करण्यासाठी पावले सरसावली आहेत. आता, माऊलींची पालखी बोरावके मळ्यात पहिल्या विसाव्याला थांबली. हिरव्यागार रानमाळावर ग्रामस्थांनी न्याहारी (नाष्टा) केला. अधूममधून सूर्याचे दर्शन आणि रिमझिम सरी, असा माहौल आहे. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सोहळा मार्गस्थ झालाय. दिंड्यामधून अंभग सुरू झाले आहेत. पावलांचा वेग वाढत आहे.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India