रविवारच्या बत्तीस किलोमीटरच्या पायपीटीनं थकलेल्या वारकऱयांना सोमवारी सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळं विश्रांती मिळाली आहे. सोमवारी सकाळपासून वारीच्या मार्गावर पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नाही. त्यामुळे, वारकऱयांच्या तंबूत पाणी शिरलेले नाही. जोर वाढला, तर वारकऱयांचे हाल होतील, ही भीती आहे. सोमवारी माउलींची पालखी सासवडला मुक्काम करणार आहे.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India