अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिही लोक
जाईन गे माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया
पंढरीची आस प्रत्येक वारकऱयाच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटासाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होतो आणि टाळ-मृदंग, हरिनामाच्या गजरात हा अपूर्व सोहळा आनंदाने पंढरीची वाट धरू लागतो. दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. काय असते ही उर्जा? कसा असतो नेमका हा भक्तीभाव? परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालत ही वारी चालते तरी कशी?...

आजपासून या ब्लॉगवर आपण चालू पंढरीच्या वाटेवर. ई सकाळसाठी शंकर टेमघरे हा ब्लॉग चालवणार आहेत आणि या वाटेवरील प्रत्येक पाऊल वारकऱयांच्या वैशिष्ट्यांसह आपल्यापर्यंत पोहचविणार आहेत. अर्थातच तुम्हाला वारीविषयक वाटलेल्या प्रत्येक भावनेचं इथं स्वागत आहे.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India